प्रतिनिधी/सांगली
गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. पण दोन तीन दिवसांतील पॉझिटिव्ह रूग्णांची वाढती संख्या पहाता येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सध्याची स्थिती चिंताजनक असल्याने नागरिकांनी आता प्रशासनाकडे बोट दाखवत बसवण्याऐवजी स्वतःसह कुटुंबाची व समाजाचीही काळजी घेण्याची गरज आहे, नियमांचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत केले.
जिल्हा प्रशासन संचारबंदी आदेशाचे प्रशासन कडक पालन करेलच. पण नागरिकांनी आता स्वतःच सोशल डिस्टन्सह नियम पाळण्याची वेळ आली आहे, जिल्हाधिकारी म्हणाले, जिह्यात सध्या 48 हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांसाठी अडीच हजारांच्या जवळपास बेड आहेत. आणखी हॉस्पिटल आणि बेड संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दररोज तीन हजारांवर संशयितांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. 1 जानेवारीपासून आतापर्यंत 9 हजारांवर रूग्ण आढळले आहेत. यामध्ये 139 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट या आठवडÎात 13.38 तर जानेवारीपासून 6.62 टक्के आहे. मृत्यू दर 1.04 टक्के आहे. हे आकडे भितीदायक नसले तरी दोन दिवसांतील वाढती संख्या धक्कादायक आहे.
बाधीतांची संख्या मोठÎा गतीने वाढत असून बेड ऑक्सिजन व अन्य अनुषंगिक वैद्यकीय सुविधा आजच्या घडीला पुरेश्या असल्या तरी या यंत्रणांना मर्यादा आहेत. याची गंभीरता लक्षात घेऊन आता प्रत्येकानेच स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी प्रशासन सर्वातरी प्रयत्नशिल आहेच. पण स्वत:चे आरोग्य ही स्वत:ची देखिल जबाबदारी आहे याची जाणिव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटाझरचा वापर, सामाजिक अंतर या बाबींचे पालन तर कराच पण प्रामुख्याने गर्दी टाळा, अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ज्या अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी निर्बधांचे काटेकोर पालन न झाल्यास त्याही सेवा बंद व दंडात्मक कारवाई केली जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.
रेमडेसिव्हिरच्या काळÎाबाजारावर नजर
रेमडेसिव्हिरचा सध्या जिह्यात पुरेसा साठा आहे. याचा तुटवडा टाळण्यासाठी आवश्यकता भासल्याच रुग्णालयांनी वापर करावा असा नियम केला आहे. पण हे इंजेक्शन `लाईफ सेव्हिंग’ मेडिसीन नाही. तर पहिल्या आठवडÎात इंजेक्शन दिल्यास त्याची गुंतागुंत कमी होते. हॉस्पीटलमध्ये ऍडमीट होण्याचा कालावधी कमी होतो, असेही त्यांनी सांगितले.
मुदत संपलेल्यांनी दुसरा डोस घ्यावा
सध्या साडेनऊ हजार डोस शिल्लक आहेत. पुण्याला पुढील साठा आणण्यासाठी गाडी पाठवली आहे. जिह्यात आतापर्यंत 3 लाख 59 हजार 997 जणांना डोस देण्यात आला असून 3 लाख 36 हजार 072 जणांना पहिला तर 23 हजार 925 जणांना दुसरा डोस दिला आहे. पहिला डोसनंतरची मुदत संपलेल्यांनी दुसरा डोस तत्काळ घ्यावा. कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनी म्हणजे एक महिन्याने तर कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस सहा आठवडÎानंतर घेतला तरी चालतो, असेही ते म्हणाले.
गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशिल आहे. त्यांना सहकार्य करा व स्वतःचीही काळजी घ्या, असे आवानहही त्यांनी केले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.