आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती, उच्चस्तरीय मंत्री समितीची 20 वी बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी कोरोना महासंकटाचा उच्चस्तरीय मंत्री समिती बैठकीमध्ये आढावा घेतला. देशातील राज्ये आणि केंद्र शासीत प्रदेशामध्ये कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱया उपचारांबाबत आणि उपाय योजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. ही या समितीची 20 वी बैठक होती.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, सध्या देशात सध्या 0.29 टक्के रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. तर 1.93 टक्के लोक आयसीयुमध्ये असून 2.88 टक्के लोक ऑक्सिजन सपार्टवर आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 9 लाखाहून अधिक स्वॅबची तपासणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला संयुक्तपणे कोरोना लसीवर परीक्षण करत आहेत. त्यांच्या चाचण्या आता दुसऱया टप्प्यात आल्या आहेत. तर सीरम इन्स्टिटय़ूट विकसित करत असलेल्या लसींचे परीक्षण आता तिसऱया टप्प्यात असून त्यांचे योग्य आणि अपेक्षित परीणाम मिळत असल्याचेही सांगण्यात आले. राज्यांच्या विधानसभा अधिवेशन सत्रांमध्ये योग्य त्या खबरदारी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, शनिवार एका दिवसात 76 हजार 472 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1021 रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृतांची एकूण संख्या 62550 झाली आहे. देशात एकूण रुग्णसंख्या 34 लाख 63 हजार 973 झाली आहे. तर 26 लाख 48 हजार 999 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 7 लाख 52 हजार 424 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.