प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लसीकरणाच्या शुभारंभदिवशीच काही ऍप बंद पडल्याने कर्मचाऱयांना संपर्क साधताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हे ऍप सुरळीत करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्न करत असून ऍप सुरळीत होण्यासाठी एक-दोन दिवसात लागण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन दिवस लसीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे.
लसीकरणाच्या दिवशी काही ऍप डाऊन झाल्याने हजारों कर्मचाऱयांना लसीकरणाचा मेसेज पोहचला नव्हता त्यामुळे पहिल्या दिवशी 50 ते 55 टक्केच लसीकरण पार पडले. या ऍपव्दारे आरोग्य कर्मचाऱयांना लसीकरणाचा मेसेज पोहचणार असून मेसेज आल्यानंतर संबंधित कर्मचाऱयांनी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. त्यामुळे तुर्तास दोन दिवस लसीकरण रत्नागिरीतही बंद राहणार आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात शनिवारी 500 पैकी 271 कर्मचाऱयांनी कोव्हिड लस घेतली मात्र यापैकी कोणालाही साईड इफेक्ट झाला नसून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली.