प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील कोरोना लसीकरण मोहिमेला अपुऱया लस पुरवठय़ाने पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हय़ासाठी कोरोना लसीचे डोस सव्वापाच हजार प्राप्त झाले होते. रविवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मात्र सोमवारी झालेल्या लसीकरणात उपलब्ध लस दुपारपर्यंतच संपून गेल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा लस उपलब्ध होईपर्यंत आरोग्य विभागाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शुक्रवारी कोव्हॅक्सीनचे सव्वापाच हजार डोस प्राप्त झाले होते. ते सोमवार 19 एप्रिल रोजी लसीकरणासाठी ठेवण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारीच ते संपल्याने आता आरोग्य विभागाकडे एकही डोस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. लसीच्या अपुऱया डोसमुळे जिल्हय़ातील कोरोना लसीकरण मोहीम बॅकफुटवर गेली आहे.
जिह्यात कोरोना लसीकरणासाठी 112 केंद्रे असली तरीही लसच नसल्याने यातील अनेक केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. जिह्यात आतापर्यंत 1 लाख 21 हजार 428 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हय़ात प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्रे आहेत.