‘वर्षअखेरीपर्यंत सर्वांना लस’ या ध्येयाकडे जोमदार वाटचाल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
या वर्षअखेरपर्यंत भारतातील सर्वांचे (बालके वगळता) कोरोना लसीकरण करण्याचे ध्येय केंद्र सरकारने दृष्टीसमोर ठेवले आहे. यग्ना ध्येयाच्या पूर्ततेकडे जोमदार वाटचाल सुरु आहे. सोमवारी संध्याकाळी सहा पर्यंत देशभरात 75 कोटीहून अधिक जणांना लसीची किमान एक मात्रा (डोस) देण्यात आला असून दोन्ही मात्रा घेऊन लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या 18 कोटींहून अधिक झालेली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्यग्ना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
सोमवारी दिवसभरात 58 लाखांहून अधिक लसी देण्यात आल्या. गेल्या पंधरा दिवसांमध्ये चार वेळा दिवसभरातील लसीकरणाचा आकडा 1 कोटीच्यग्ना वर गेला होता. ऑगस्ट आणि सप्टेंबरात (आतापर्यंत) 30 कोटींहून अधिक लोकांना लसीची किमान एक मात्रा देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत एकंदर लसीकरण 75 कोटी 60 लाखाची मर्यादा पार करुन गेले आहे. हे लसीकरण युरोप व अमेरिकेच्यग्ना एकंदर लसीकरणापेक्षाही जास्त आहे, काही तज्ञांचे मत आहे.
ध्येयपूर्तीच्या जवळ
सप्टेंबरच्या शेवटापर्यंत लसीकरणाचे प्रमाण 80 कोटींहूनही अधिक होईल. त्यानंतरच्या तीन महिन्यग्नांमध्ये, अर्थात या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान 120 कोटी लोकांना लसीची एक तरी मात्रा देण्याची यग्नोजना आहे. हे ध्येय कदाचित नियोजित वेळेआधीच पूर्ण होऊ शकते, असा विश्वासही व्यक्त करण्यग्नात येत आहे.
पुरेसा पुरवठा
देशात एकंदर चार लसींना अनुमती देण्यात आली असली तरी मुख्य लसीकरण स्वदेशनिर्मित कोव्हॅक्सिन आणि स्वदेश उत्पादित कोव्हीशिल्ड यांचेच होत आहे. सरकारी केंद्रांमध्ये ते विनामूल्य होत असून खासगी केंद्रांमध्ये त्यासाठी पूर्वनिर्धारित शुल्क आकारण्यग्नात येत आहे. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही केंद्रांना आता जनतेचा उत्साही प्रतिसाद मिळत असून लसींसंबंधीची भीती मोडली गेली आहे. लसीकरण अभियानाच्या प्रारंभीच्या काळात लसींचा तुटवडा जाणवत होता. पण आता मोठय़ा प्रमाणात उत्पादन होत असल्याने पुरेसा पुरवठा होत आहे.
रुग्णसंख्येत आणखी घट
देशात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी घट दिसून आली. गेले सलग 78 दिवस प्रतिदिन रुग्णसंख्या 50 हजारच्यग्ना खाली राहिली आहे. रविवार ते सोमवार या 24 तासांच्या काळात नवे 27,254 रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत 219 लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला, तर 37,906 रुग्ण बरे झाले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्यग्ना 3,47,269 पर्यंत खाली आली. याच 24 तासांमध्ये देशभरात 12,08,247 चाचण्या करण्यात आल्या. बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.54 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. तर प्रतिदिन पॉझिटिव्हीटी दर 2.26 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. हा दर गेले सलग 95 दिवस 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
कोव्हॅक्सिला मान्यता मिळणार
भारतातील स्वदेश निर्मित कोव्हॅक्सिन या लसीला या आठवडय़ात जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळेल अशी शक्यता आहे. या लसीवरील सर्व परीक्षणे पूर्ण झाली असून तिची प्रतिकार क्षमता सिद्ध झाली आहे. भारतात या लसीचा उपयोग अनेक महिन्यांपासून यशस्वीरित्यग्ना होत आहे. या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाल्यास ही लस घेतलेल्या भारतीयांना परदेशी जाणे शक्य होणार आहे. तसेच या लसीची भविष्यकाळात निर्यात करणेही शक्य होणार आहे. त्यामुळे मान्यता मिळणे महत्वाचे असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
लसीकरणाचा दिलासा
ड लसीकरणाचा वेग समाधानकारक, प्रतिदिन 70 लाखांची सरासरी
ड दुसरी मात्रा (डोस) घेणाऱयांच्या संख्येतही समाधानकारक प्रगती
ड अनेकांकडून दुसरी मात्रा हेतुपुरस्सर टाळल्याच्यग्ना घटनाही उघड
ड प्रतिदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट, बरे होण्याच्या प्रमाणात वाढ
ड तिसऱयग्ना उद्रेकाची शक्यता लक्षात घेऊन आधीपासूनच सज्जता