प्रतिनिधी / मिरज
कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी मिळणारी प्रतिकारशक्ती पाच ते दहा वर्षे टिकू शकते, असा दावा डॉ. संदीप देवल यांनी केला. ते रोटरी क्लब ऑफ मिरज तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित जोशी होते.
बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाली व त्यांच्यामध्ये या विषाणू विरुद्ध लढणारी प्रतिकार शक्ती ही निर्माण झाली आहे. पण ही प्रतिकारशक्ती काही दिवसच टिकू शकते. असे असले तरी लस घेणे आवश्यक ठरते. कारण लसीमुळे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मिळणारी प्रतिकारशक्ती पाच ते दहा वर्षे टिकू शकते, असे डॉ. संदीप देवल म्हणाले.