ऑनलाईन टीम / तिरुवअनंतपुरम :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढत आहे. कोरोना व्हायरसचा भारतातदेखील तिसरा रुग्ण आढळला आहे. तिन्ही रुग्ण केरळमधील आहे. यामुळे केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून राज्यात आपत्तीची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राज्य आपत्ती घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारनं राज्य आपत्ती घोषित केलेली असून, सर्वच जिह्यांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, केरळमध्ये चीन आणि कोरोना व्हायरस प्रभावित देशांचा दौरा करणारे 1, हजार 999 लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी अधिकतर जणांना विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 75 जणांना वेगवेगळय़ा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.