मजुरांच्या राहण्या, जेवणाची केली व्यवस्था, शारीरिक मानसिक शिस्तीलाही दिले प्रोत्साहन
समीर नाईक/ पणजी
कोरोनाच्या काळात अनेक राज्याबाहेरील मजुर, कामगार जे कामानिमित्त आले होते व लॉकडाऊनमुळे गोव्यातच अडकलेले होते. त्यांच्या राहणाची सोय, जेवणाची सोय, त्यांना मार्गदर्शन देण्याच्या हेतुने राज्य सरकारने खास मजुर निवारा केंद्रे तयार केली होती. मिरामार येथील युथ हॉस्टेलनेही ही जबाबदारी स्वीकारली आणि यशस्वीपणे पार पाडली.कोरोनाच्या संकटकाळात माणुसकी जपण्याचे काम या संस्थेने केले.
मिरामार येथील युथ हॉस्टेलमध्ये याकाळात दररोज सुमारे 60 तरी मजुर राहायला होते. यामध्ये नेपाल, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडीसा, तेलंगाणा, कर्नांटक, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, बिहार, आसाम, झारखंड, हिमाचल प्रदेश, तसेच एक व्यक्ती चीनमधील देखील होता. यावेळी त्यांची राहण्याची सोय, सर्वांना जेवण, त्यांचे आरोग्य सांभाळणे, त्यांच्या भावना सांभाळणे हे सर्वांत आव्हानात्मक काम होते. हे काम युथ हॉस्टेलचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी सहजरित्या हाताळले.
सुमारे दरदिवशी नाष्टा, दुपारे जेवण, रात्रीचे जेवण असे मिळून 13 हजार पेक्षा अधिक जेवण या केंद्रमध्ये यादरम्यान तयार व्हायचे. तसेच सुमारे 1500 पेक्षा अधिक बाहेरील लोकांना जे सेंटर हाऊसफुल असल्यामुळे बाहेर राहायचे त्यांना जिवनावश्यक वस्तु पुरविण्यात आले. अनेकजण जे या सेंटरमध्ये अडकून पडले होते ते बहूतेक सर्वजन प्रवासी मजुर असल्यामुळे त्यांना सांभाळणे, त्यांच्या जिवनशैलीला सांभाळणे हेच मोठे आव्हान येथे होते. या आव्हानाला सामोरे जात सरकारने दिलेले मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन हे आव्हान अनंत जोशी यांनी हे आव्हान पेलले.
मजुर, कामगारांना लावली शिस्त
अनंत जोशी यांनी सर्वांत आधी जर कोणते काम केले तर ते मजुर, कामगारांना शिस्त लावली. त्यांनी या मजुर, कामगारांसाठी वेगळा दिनक्रमच तयार केला होता. यामध्ये सकाळी लवकर उठणे, व्यायाम-योग, नाष्टा, हॉस्टेल व आजुबाजुच्या परीसराची साफसफाई, श्रमदान, जेवण, नंतर कोरोनाबद्दलची जागृती कार्यक्रम, देशातील, त्यांच्या राज्यातील, गोव्यातील कोरोबाबतची माहीती त्यांना देण्यात यायची, नंतर सर्वांना त्यांच्या घरी फोन करण्याची संधी, नंतर पारंपारीक खेळ, आरोग्य तपासणी, यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांना शिस्त लागली, त्यांच्यामधील द्वेषाची भावना संपली, चांगली पारीवारीक भावना या मजुरांना. कामगारांमध्ये तयार झाली होती.
रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली
दर पंधरा दिवसांनी या कामगरांना रोजगाराची संधी युथ हॉस्टेलने उपलब्ध करुन दिली. जेणेकरुन त्यांना त्यांच्या स्वःताच्या खर्चासाठी काही पैसे मिळाले. तसेच त्यांना अनेकदा मार्गदर्शन करण्यात आले की गोव्यात रोजगारच्या अनेक संधी असल्याचे सांगूण त्यांना गावी न जाता इथेच राहून काम करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. यांच्या परीणात्मक सुमारे 30 ते 35 कामगार अजूनही गोव्यात असून काम करत आहे.
प्रोत्साहन देण्याहेतू अनेक उपक्रम
येथे राहीलेल्या कामगारांनी श्रमदान करताना अनेक कामे केली. त्यामुळे त्यांना श्रमदानाचे महत्व कळाले. याच अनुषंगाने त्यांना प्रोत्साहन देण्याहेतू अनेक उपक्रम येथे राबविण्यात आले. प्रत्येक दिवशी सर्वोकृष्ट योगदान देणऱया कामगाराची निवड करुन त्यांना सर्वांपुढे सन्मानित करण्यात यायचे. तसेच या दरम्यान अनेकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ज्यांनी कधीच वाढदिवस साजरा केला नव्हता त्यांना हा अविस्मरणिय क्षण होता.
कामगारांनी केली कृतज्ञता व्यक्त
जेव्हा सरकारतर्फे या कामगारांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी श्रमीक एक्सप्रेस सुरु झाली तेव्हा या कामगारांना योग्य मार्गदर्शन देऊन घरी पाठविण्यात आले. तसेच त्यांना वाटेत खाण्यासाठी जेवण तयार करुन देण्यात आले. काही पैसे देखील त्यांना प्रवासासाठी देण्यात आले. घरी पोहचून त्यांना युथ हॉस्टेलला फोन करुन आपण पोहचल्याची माहीती दिली व वाईट परिस्थितीत त्यांची चांगल्याप्रकारे सांभळ केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
माणुसकी जपणे हेच ध्येय होतेः अनंत जोशी
आमच्या केंद्रात विविध राज्यातील, विविध माणसिकतेची, वेगळय़ा जिवनशैलीच्या लोकांना सांभाळणे हेच सर्वांत मोठे आव्हान होते. परंतु मला नेव्हीची पार्श्वभुमी असल्यामुळे हे आव्हान पेलणे सोपे झाले. नेव्हीमध्ये असताना खुप काही शिकलो त्याचा अनुभव मला येथे कामी आला. या सर्व कामागारांसोबत मी देखील ते घरी जाईपर्यंत त्यांच्यासोबत युथ हॉस्टेलमध्ये थांबलो. त्यांना स्वःताच्या हातीने माझ्या बायको व एक मदतनीस महिलेच्या मदतीने दररोज जेवण करुन वाढायचो. बहुतेक सर्व प्रवासी येथे होते त्यामुळे जिवनाचा खरा सार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. यासर्व घडामोडीत माणूसकी जपणे हेच ध्येय होते. असे युथ हॉस्टेलचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी सांगितले.