ऑनलाईन टीम / कोलकाता :
देशात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. महाराष्ट्र, दिल्लीनंतर आता पश्चिम बंगालमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. राज्यातील करोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुन्हा एकदा लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या लॉक डाऊनमध्ये मागच्या वेळी पेक्षा अधिक सुट दिली जाणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये 30 जून पर्यंत रेल्वे सेवा आणि मेट्रो, शाळा – कॉलेज पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात आतापर्यंत 14,728 कोरोना रुग्ण आढळले असून त्यातील 580 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 9218 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात 4930 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.