प्रतिनिधी/ पणजी
कैद्यांना पॅरोलवर सोडत नल्याने गेल्या तीन दिवसांपासून कोलवाळ तुरुंगातील कैद्यांनी संप पुकारला आहे. गेले दोन दिवस कैद्यांनी खाण्यापिण्यावर बहिष्कार घातला असल्याने चार कैद्यांची प्रकृती बिघडली आहे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कैंद्यांना पॅरोलवर सोडणे बंधनकारक आहे. कोलवाळ तुरुंगातील अधिकाऱयांनी कैदी पॅरोलवर जाण्यास तयार नसल्याचे सागून कैद्यांना पॅरोलवर सोडणे टाळले आहे. ही माहिती कैद्यांना मिळताच त्यांनी संप पुकारला आहे. सुमारे 400 कैदी आपल्या मतावर ठाम आहेत.