प्रतिनिधी / पणजी
कोलवाळ तुरुंगातील धान्य साठय़चा काळाबाजार होत असल्याने ठरलेल्या वेळी अगोदरच धान्याचे गोदाम रिकामे होत असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसपूर्वी महिना संपण्या अगोदरच ध्न्याचा कोठ संपल्याने कैद्याना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात होता. अखेर कैद्यांनी तुरुंगातच उपोषण केले हेते. कैद्यांनी केलेल्या उपोषणामुळे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. धान्यसाठय़ाचा काळाबाजार होत असल्याने अवेळी धान्य कोठा संपल्याचेही उघड झाले आहे. या काळ्याबाजाराला खरा जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तुरुंगातील भोजन गृहाची जबाबदारी एका सहाय्यक जेलरकडे आहे. त्याला सहकार्य करण्यासाठी एका जेलगार्डचीही नेमणूक केली आहे. भोजन गृहाची जबाबदारी जरी सहाय्यक जेलरकडे असली तरी भोजन गृहाच्या गोदामाच्या चाव्या कैद्यांकडे असतात. सुमारे 30 ते 35 कैदी भोजनगृहात काम करीत असतात. भोजन गृहाच्या गोदामाच्या चाव्य त्यांच्याकडेच असल्याने ते पाहिजे तो गोंधळ घालीत असतात. तुरुंगातील काही भाई लोक स्वतः जेवण तयार करीत असून धान्य गोदामातील सामान बेकादेशररित्य कैद्यांना विकले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
दर महिन्याच्या 30 ते 5 तारखेच्या दरम्याने तुरुंगात धान्यचा कोठा येत असतो. 5 तारखेनंतर पुढे किमान दहा दिवस पुरणार इतका धान्याचा कोठा तुरुंगात पुरविला जात असतो. तुरुंगात 550 कैद्यांसाठी धान्यसाठा येत असतो. 550 कैद्यमधील सुमारे 100 कैदी हे पॅरोलवर गेले आहेत. म्हणजेच एप्रिल महिन्या पासून प्रत्यक्षात तुरुंगात 450 कैदी आहेत. त्यातील 300 कैद्यांचा न्यायालयात खटला सुरु आहे तर 150 कैदी हे शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात प्रत्यक्षात 450 कैदी असताना धान्यसाठी मात्र 550 कैद्यांसाठी येत असतो असे असताना जुलै महिन्यात 28 तारखेच्या अगोदरच धान्यसाठा संपला कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तुरुंग अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे की कैदी आणि तुरुंग कर्मचाऱयांचे साटेलोटे असून धान्यसाठय़ाचे गोडबंगाल केले जात आहे. अनेकवेळा बिलेही भरमसाठ लावली जात असल्याचे उघड झाले आहे. अत्तापर्यंत कैद्यांनी पॅरोलसाठी किंवा अन्य बारीकसारीख कारणासाठी संप केले होते मात्र तुरुंगात आहार व्यवस्थित मिळत नाही म्हणून कधीच संप केला नव्हता मग आताच ही पाळी कशी आली असा प्रश्न उपस्थि झाला आहे.
आग्वाद येथे तुरुंग असताना धान्यसाठय़ाचा गोदाम हा तुरुंगा बाहेर होता. भोजनगृहासाठी दर दिवसाला जो कोठा पाहिजे होता तितकाच कोठा कैद्यांकडे दिला जात होता त्यामुळे गोदामाच्या चाव्या जो कुणी भोजनगृह प्रमुख असेल त्याच्याकडेच राहत होत्या. त्यमुळे धान्याचा साठी किती संपतो याची माहिती प्रमुखाकडे मिळायची. कोलवाळ तुरुंगात मात्र प्रकार वेगळा आहे. धान्यकोठा गोदाम हा तुरुंगातच असून त्याच्या चाव्य कैद्यांकडेच असतात त्यामुळे भोजनगृहात काम करणाऱया कैद्यांना सगळे रान मोकळे असते. यात तुरुंग कर्मचाऱयांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कोलवाळ तुरुंगात काही भाई लोक असून त्यांच्यासाठी तुरुंग म्हणजे शिक्षा भोगण्यासाठी नसून ते एक पंचतारांकीत हॉटेल असल्यासारखेच जगत असतात. त्यांना पाहिजे त्या वस्तू तुरुंगात उपलब्ध होत असतात. तुरुंगात ड्रगचा व्यवहार होत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. विडी, तंबाखू सारख्या सगळ्या चैनीच्या गोष्टी त्यांना मिळत असतात. तुरुंगात सुमारे सात ते आठ सेल मध्ये स्वतंत्र इलेक्ट्रीक इंडक्शन असून हे कैदी स्वतःसाठी जेवण स्वतः तयार करीत असतात. वास्तविक कैद्यांना इंडक्शनचा वापर करायला देणे हे बेकायदेशीर आहे. मात्र सर्वच अधिकारी या गोष्टीकडे जाणूनबूजून डोळेझाकपणा करीत असतात. धान्यसाठा गोदामात येणारे सामान बेकायदेशीर रित्या या कैद्याना विकले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
केद्यांनी केलेल्या उपोषणानंतर तुरुंगात धान्यसाठय़ाचा काळाबाजार होत असल्याचे जवळजवळ उघड झाले आहे. आता कारवाई कोणावर होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. धान्यसाठय़ाच्या गोदामाचा प्रमुख सहाय्यक जेलेर मात्र गोदामाच्या सर्व चाव्या कैद्यांकडे. केवळ देखरेख करण्यासाठी एका जेलगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र चाव्या कैद्यांकडे असताना जेलगार्ड कसली देखरेख करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. या साऱया प्रकाराला जबाबदार कोण आणि आता बळीता बकरा कोणाला करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.