सासष्टीतील किनारपट्टीवर दिसणारे चित्र, कोविड नियम झुगारून लोकांची धाव, स्थानिकांचा जास्त भरणा
प्रसाद नागवेकर /मडगाव
कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजारपर्यंत खाली उतरली असल्याने तसेच दैनंदिन रुग्णांची संख्या दोनशेच्या खाली आली असल्याने लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याने स्थानिक लोक किनाऱयांवर गर्दी करू लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून कोविडच्या तिसऱया लाटेची शक्मयता वर्तविली जात असल्याने कोलवा किनाऱयाला भेट देण्यासाठी येणाऱया लोकांना पोलीस परतवून लावत असल्याचे दिसून आले आहे.
रविवारी सायंकाळी कोलवा पोलिसांनी कोलवा किनाऱयाच्या प्रवेशमार्गावर काही पोलीस तसेच वाहतूक पोलिसांचा पहारा ठेवून येणारी चारचाकी तसेच दुचाकी वाहने ती पार्क करण्याच्या आधीच परतवून लावली. किनाऱयावर प्रवेश दिला जाऊ शकत नसून कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन आवश्यक असल्याने प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे पोलीस सांगताना आढळत होते.
स्थानिकांची गर्दी
कोलवा सासष्टीसह दक्षिणेतील मुख्य किनारा आहे. जागतिक नकाशावर नोंद झालेला हा किनारा लोकप्रिय असल्याने देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिकांमध्ये हा किनारा पसंतीचा आहे. त्यामुळे येथे भेट देण्यास ते प्राधान्य देत असतात. कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या कर्फ्यू व सीमेवर नाकाबंदी असल्याने पर्यटकांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे स्थानिकच किनाऱयावर गर्दी करत असल्याचे दिसून येते. गेल्या रविवारी लोकांनी कोलवा किनाऱयावर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळे या रविवारी पोलिसांकडून कडक भूमिका घेण्यात येऊन किनाऱयावर प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती येथील एका उपाहारगृहाच्या चालकाने दिली.
…तर तिसऱया लाटेला आमंत्रण
सोशल डिस्टन्सिंग व अन्य कोविडविषयक नियम पाळणे हे लोकांच्या हाती आहे. सध्या कोविडचा जोर ओसरला असला, तरी लोकांनी किनारे व अन्य ठिकाणी अशीच गर्दी केली, तर तिसऱया लाटेला आम्हीच आमंत्रण दिल्यासारखे होईल, असे मत मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी व्यक्त केले.
अन्य किनाऱयांवर गर्दी
कोलवा किनाऱयावर प्रवेशबंदी करून पोलिसांनी चांगले काम केले असले, तरी कोलव्याला भिडून असलेल्या बाणावली, ट्रिनिटी, सेर्नाभाटी अशा नजीकच्या किनाऱयांकडे स्थानिकांनी मोर्चा वळविल्याने अशा किनाऱयांवर वर्दळ दिसून आली. अशा किनाऱयांकडे जाणारे रस्ते चिंचोळे असल्याने व त्यातच लोकांनी मिळेल त्या जागी वाहने पार्क केल्याने या किनाऱयांकडे जाताना वाहतुकीची कोंडी दिसून आली. कर्फ्यूच्या काळात लोक अशा प्रकारे किनाऱयांवर गर्दी करत असल्याने पोलीस तसेच वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्याची गरज काहींनी व्यक्त केली.