प्रतिनिधी/ बेळगाव
शहरामध्ये शीतपेय दुकाने मोठय़ा प्रमाणात आहेत. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात उलाढाल होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे आम्हाला कोल्ड्रिंक्स दुकाने बंद करावी लागली आहेत. त्यामुळे मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारी ते मे पर्यंत हा व्यवसाय जोमात असतो. मात्र याच कालावधीत हा आजार आला आहे. त्यामुळे आम्ही मोठय़ा आर्थिक संकटात सापडलो असून आम्हाला सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बेळगावातील कोल्ड्रिंक्स चालकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्ड्रिंक्स व्यवसाय केवळ वर्षातील सहा ते सात महिने चालतो. त्यानंतर पूर्णपणे हा व्यवसाय बंद करावा लागतो. या सहा ते सात महिन्यांमध्येही केवळ तीनच महिने व्यवसाय जोरात होतो. त्यानंतर व्यवसायावर मंदी असते. जेंव्हा व्यवसाय होता तेंव्हाच कोविड-19 या आजाराचा फैलाव झाला. त्यातच कोल्ड्रिंक्स पिऊ नये, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आणखीनच फटका बसला आहे.
मागीलवषी महापुरामुळे फटका बसला होता. त्यानंतर आता कोरोनामुळे फटका बसला आहे. अनेक दुकाने भाडोत्री जागेत आहेत. याचबरोबर लाईट बिलही मोठय़ा प्रमाणात येत आहे. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो असून सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.
सध्या कोल्ड्रिंक्स दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. आता लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षच आम्हाला ही दुकाने बंद करावी लागणार आहेत. तेव्हा दुकाने सुरू करण्यासही मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शेखर हंडे, सेपेटरी सुरेश बसरीकट्टी, शिवाजी हंडे, ऍड. नागेश सातेरी, वैजनाथ भोगण, लक्ष्मण शहापूरकर, शाम हदगल, किरणकुमार अंबीपी, कीर्ती बरड, सुधीर कडेमनी, प्रकाश बसरीकट्टी, सूरज बसरीकट्टी, सतीश बिर्जे, जोतिबा बसरीकट्टी, चंद्रकांत तांदळे, श्रीकांत पाटील, राजू शहापूरकर, पुंडलिक शहापूरकर, सागर बसरीकट्टी, वैजनाथ उच्चुकर यांच्यासह कोल्ड्रिंक्स चालक उपस्थित होते.