कोल्हापूर \ ऑनलाईन टीम
दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची मुसळधार बॅंटींग सुरू असुन गुरूवारी तर पावसाने कहर केला आहे. संतधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्या आहेत. नदीकाठच्या गावातील नागरिक तसेच जनवारांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ज्या गावांना महापूराचा धोका आहे त्या गावात एनडीआरएफच्या तुगड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
कोल्हापुरातील पूरस्थिती Live Update फक्त एका क्लिकवर :
काळम्मावाडीतून १००० क्युसेक विसर्ग सुरु, धरण ७२ टक्के भरले
शिरोळ तालुक्यातील महापुरची धास्ती नऊ मार्गावर महापुराचे पाणी तर पाच गावातील नागरिकांना स्तरांतील, प्रशासन यंत्रणा सज्ज.
म्हासुर्ली पैकी बेघरवाडी (ता राधानगरी ) येथील राजाराम आबा गुरव यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात धामणी नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गोठ्याची इमारत कोसळून भिंतीच्या भरावाखाली दबून एका बैलजोडी सह दोन म्हशींचा मृत्यू झाल्याने सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
प्रयाग चिखली, आंबेवाडी गावामध्ये अध्याप दीड हजारावर लोक जनावरांसह महापुरात अडकले…. शासनाचे मदत कार्य सुरु…. चिखलीतील लोकांना बोटी द्वारे बाहेर काढण्यात येत आहे.
काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात एका दिवसात तब्बल ४८० मि. मि. पावसाची नोंद !
धरण ६९ टक्के भरले :दूधगंगा नदी पात्राबाहेर
धरण क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे येथील कृष्णा नदीचे पात्र ओलांडून वाहत आहे. सांगली कोल्हापूर बायपास राज्यमार्ग वाहतुकीस आज सकाळी बंद झाला.चालकाच्या अतिआत्मविश्वासामुळे खासगी बस नदीत बुडाली- पांगिरे ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामूळे १४ प्रवाशांचे जीव वाचले
राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाना पाणी लागले आहे.
महे भैरवनाथ टेकडी शेजारी दरड कोसळली, सुदैवाने जीवित हानी टळली.
मिणचे खुर्द /वार्ताहर — कोळवण ता.भुदरगड येथे गावाच्या पश्चिमेकडील बाजूस अतिवृष्टीमुळे जंगल हद्दीतील मो-याचा नाळवा या ठिकाणी दरड कोसळून २५ ते ३० एकर पेक्षा अधिक भात शेतीचे लाखों रुपयेचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात आज दिवसभरात 567 मी मी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 2444 मी मी पावसाची नोंद आहे
राधानगरी धरण हे 90 टक्के भरले असून पावसाचे प्रमाण अधिक असल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी खुले होऊ शकतात.
सध्या पिरळ पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने शेतीचे खूपच नुकसान झाले आहे.
नानीबाई चिखलीमध्ये पुराचे पाणी गावात शिरले , 2019 ची पुनरावृत्ती नानीबाई चिखली परिसरात गेल्या चार दिवसा पासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नानीबाई चिखली मध्ये दोन एकूण 2019 पेक्षाही ज्यादा महापूर आल्याने जवळजवळ 300 ते 400 घरामध्ये पाणी शिरले आहे सदर घरातील कुटुंबाने गावातील प्राथमिक शाळा हायस्कूल बसवेश्वर हाल तसेच मिळेल त्या ठिकाणी आपल्या जनावरांसह स्थलांतर केले आहे.
पन्हाळ्याचा मुख्य रस्ता पुन्हा खचला, गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांत घबराहट:2019ची पुनरावृत्ती:पर्यायी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर
पन्हाळा : सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावासाने पन्हाळ्यासह परिसरात कहर केला आहे.पावसामुळे पावनगड येथील तटबंदी,तीन दरवाजा येथील रस्त्याला भेगा पडल्या आहेत.त्यातच आज पहाटे पन्हाळगडाचा मुख्य मार्ग असलेला चार दरवाजा येथील रस्ता खचल्याने यात आणखी भर पडली आहे.या घटनेमुळे आँगस्ट 2019 साली पन्हाळ्याचा मुख्य मार्ग खचण्याची पुनरावृत्ती झाली आहे.यामुळे या मुख्य मार्गावरील वाहतुक पुर्ण बंद ठेवण्याचे आदेश तालुका प्रशासनाने दिले आहेत.
कोल्हापूर : पुणे-बंगलोर महामार्गावरील शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक पूर्ण बंद,
गेले दोन दिवस पाऊस सतत चालू असल्याने पुणे बेंगलोर महामार्गावर कागल पासून पुढे असलेल्या दोन्ही पुलावर पुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद करण्याचे आदेश आले असून सकाळी सहा वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक पूर्ण थांबवली असल्याची माहिती गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील यांनी सांगितले. ही वाहतूक आज सकाळपासून कागल पंचतारांकित एमआयडीसी येथील लक्ष्मी टेकडी व जाजल पेट्रोल पंपाजवळ थांबवली असून याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शिवाय अवजड वाहतूक आहे ती वाहने कागल पंचतारांकित एमआयडीसी रोडला व जाजल पेट्रोल पंप व महामार्गावरच या वाहनांची पार्किंग सोय या ठिकाणी केली आहे. यावेळी गोकुळ शिरगाव पोलीस व महामार्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे . यांना शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते शिवसेना तालुकाप्रमुख विनोद खोत, भगवान कदम हेसुद्धा पोलिसांना या कामात मदत करत आहेत.
गगनबावडा : कोनोलीपैकी कुपलेवाडी ता.राधानगरी येथे भूस्कलन होऊन दोन घरे जमिनदोस्त झाली.रात्री १२ वाजता ही घटना घडली.एक पुरुष एक महिला पाच जनावरे ढिगाऱ्याखाली सापडले आहेत.
पडळी दाजीपूर रस्ता बंद, राऊतवाडी धबधबा शेजारी रस्त्यावर दरड कोसळली.
राधानगरी मॉन्सून अपडेट : शुक्रवारी 23 जुलै सकाळी 6 वाजत
राधानगरी धरण परिसरात गेल्या 24 तासात विक्रमी 567 मिलीमीटर पाऊस झाला असून पाणी पातळी 341.30 फूट झाली आहे.
करजफेन तालुका राधानगरी येथील अरूंद फुल जाम झाल्याने, प्रवाहाची दिशा बदलून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कारीवडे ता, राधानगरी येथे जमीन खचली
कोल्हापूर : शहर पाणीपुरवठा विभागाचे सर्व वाॕटर पंपिंग स्टेशन महापूरामुळे बंद झालेली आहेत . त्यामुळे पूर ओसरेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील . महानगर पालिकेकडून tanker द्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेत येईल . तरी ह्या संकटकाळी पाण्याचा जपून वापर करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे ही विनंती