प्रतिनिधी/कोल्हापूर
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही वेळ ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक अनुभव बुधवारी अनुभवायला मिळाला.
सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर सावली आपल्या पायाखाली पडते का हे पाहण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. कारण शून्य सावलीबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कोल्हापूर, मिरज, सांगली जिल्हय़ात शून्य सावलीचा अनुभव मिळाला. महाराष्ट्रातील सर्वच जिल्हय़ांना वेगवेळय़ा तारखांना झिरो शॅडोचा क्षण अनुभवायला मिळणार आहे.