आरोग्य मंत्री, जिल्हा प्रशासन यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा
व्यापारी संघटनांचा दावा : जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी 10 टक्के पेक्षा कमी झाल्याने परवानगीला बळकटी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्कÎांच्या आत आल्याने कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसऱया टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्व दुकाने सोमवारपासून (दि. 19) सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता गडद झाली आहे. शुक्रवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱयावर आले होते. यावेळी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेऊन सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची आग्रही मागणी केली. सायंकाळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱयांनी जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम व अटींस अधीन राहून व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
व्यापारी संघटनांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट
कोल्हापूर दौऱयावर आलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱयांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्हÎातील पॉझिटीव्हीटीचा रेट दहा पेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसऱया टप्प्यात आला आहे. त्यामुळे या टप्प्यातील नियमानुसार सर्व दुकाने, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली. यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिल्याचा दावा व्यापारी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाबरोबर कोल्हापूर चेंबरची चर्चा
सायंकाळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह चेंबरच्या पदाधिकाऱयांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील, शहरातील कमी झालेला पॉझिटीव्हीटी रेट या संदर्भातील सविस्तर माहिती सादर करण्यात आली. गेल्या आठवडÎापासून पॉझिटीव्हीटी रेट कमी होत आला आहे. त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावर शहरातील दुकाने सुरू करण्यात आली होती. त्याकाळातही पॉझिटीव्हीटी घटला असल्याचे चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. परवानगी दिल्यानंतर सर्व व्यापारी नियमांचे तंतोतंत पालन करून व्यापार, व्यवसाय करतील, आपण परवानगीचा आदेश जारी करावा, अशी विनंती शेटे यांनी या चर्चेत केल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासननही सकारात्मक असल्याने परवानगी मिळण्याची शक्यता गडद झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवार दि.19 पासून उघडणार असा पवित्रा व्यापाऱयांनी घेतला आहे. अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने गेल्या 100 दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱयांनी सोमवारपासून काहीही झाले तरी दुकाने सुरू करणार अशी भूमिका घेतली आहे.
राजारामपुरी व्यापारी सोमवारी दुकाने सुरू करण्यावर ठाम
जनता बाजार चौक येथे राजारामपुरीतील व्यापाऱयांची बैठक झाली. सोमवारपासून सर्व व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आतापर्यंतच्या लढÎाची माहिती दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीची माहिती देऊन आरोग्यमंत्र्यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचे आदेश देण्याचे मान्य केल्याची सांगितले. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक अहवाल देऊन व्यापाऱयांच्या मागणीला पाठबळ दिल्याबद्दल आभार मानण्यात आले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सतीश माने, शाम बासरानी, अनिल पिंजानी, दर्शन गांधी, विपुल पारेख, माणिक पाटील -चुयेकर, प्रताप पवार, किरण नकाते, जयंत गोयानी, मनोज बहिरशेठ, आदी उपस्थित होते
महाद्वाररोडवरील व्यापारीही आक्रमक
शहरातील सर्व दुकाने सुरू करण्यासंदर्भात शुक्रवारी महाद्वाररोड येथील व्यापाऱयांनीही बैठक घेतली. सोमवारपासून त्यांनीही दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ललित गांधी, किरण नकाते, सराफ संघाचे कुलदीप गायकवाड, जयदेव ओसवाल, मनोज बहिरशेट, पंकज भांबुरे, नितीन सांगलीकर, प्रताप मेहता, जयंत गोवाणी उपस्थित होते.
राज्यशासनाच्या निर्णयाकडे नजरा
कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय जाहीर करू शकते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला या संदर्भातील ऑर्डर काढता येते. राज्य सरकारकडून शुक्रवारी रात्री कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे हा निर्णय राज्यशासनाकडून कधी होणार? याकडे व्यापारी वर्गाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.