प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात दोन दिवसापासून थंडी जाणवू लागली आहे.पारा घसरत असून गुरुवारी किमान तापमान 16.6 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 28 अंश सेल्सियस राहिले.दिवसभर बोचऱया वाऱयामुळे कोल्हापूरकर गारठले. जानेवारीचा मध्य आला तरी यंदा थंडी गायबच राहिली. बुधवार पासून मात्र वातावरणात बदल झाला आहे.बुधवारी उष्मा कमी होऊन हवेत गारठा निर्माण झाला. सायंकाळी सहानंतर थंडीमध्ये वाढ झाली. गुरुवारी सकाळीही हुडहुडी भरवणारी थंडी होती.तर दिवसभर बोचरा गार वारा होता. रात्रीच्या वेळी उपनगर आणि ग्रामीण भागात शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी सकाळी फिरायला जाणाऱया नागरिकांची संख्या वाढत आहे.
तापमान
दिनांक किमान कमाल
14 जानेवारी 18.0 29.5
15 जानेवारी 17.16 29.7
16 जानेवारी 16.00 28.00