वेगळ लढणार हे तर नाटकच..
प्रतिनिधी / पुणे
महाविकास आघाडीमधील तीन पक्षांची वेगवेगळे लढण्याची भूमिका घेतली, हे केवळ नाटक असून एकत्र आले तर तिकीट वाटपावरुन भांडणं सुरु होतील अशी त्यांना भीती आहे. म्हणून वेगळ लढण्याचा सूर आळवला जात आहे. हे न कळायला कोल्हापूरची जनता मूर्ख नाही. असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. शनिवारी दुपारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचे स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी पलटवार केला.
ते म्हणाले, स्थानिक निवडणुकीत तिघे एकत्र राहू शकत नाहीत. प्रत्येका झेंडा वेगळा अजेंडा वेगळा आहे. एकमेकांचे विचारही भिन्न आहेत. त्यामुळे एकत्र लढलो तर उमेदवारीवरुन भांडणं होणार आहेत. कार्यकर्ते दुसऱया पक्षाच्या गळाला लागतील ही भीती निवडणुकीपूर्वीच लागल्याने वेगळे वेगळे बोलत आहेत. अजून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र भीतीपोटी आतापासून वातावरण तयार केले जात आहे. अशी टिका पाटील यांनी केली. त्यांनी वेगळ लढो अथवा एकत्र आम्हाला काही फरक पडत नाही. असे सांगत त्यांनी याचा भाजपला फायदाच होणार असल्याचे संकेत दिले. केवळ कोल्हापूरच काय राज्यातील मुंबईसह सर्व महापालिका, पालिका, निवडणूक ताकदीने लढण्याची आमच्यातही धमक आहे. असा इशारा त्यांनी दिला. विधान परिषद निवडणुकीत तिघांची बेरीज एक लाख वीस हजार पर्यंत जाते. भाजप एकटÎाची बेरीज 71 हजारच्या पुढे आहे. यावरुन आजही कुणाची ताकद आहे. हे दिसते.