तरुण भारत ऑनलाइन टीम
बंटी पाटील यांनी शिवसेनेच्या बाजूने बोलायचा ठेका घेतला आहे का? असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. बंटी पाटील हे कोल्हापूरची शिवसेना ताब्यात घेत आहेत. असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, लोकशाहीत मतदार हा राजा आहे. भाजपच्या मतावरच कोल्हापुरात शिवसेना निवडून येत होती. त्यामुळे पाठीत खंजीर कोणी खुपसला, हे सर्वांना माहिती आहे. एक वेळ माझ्या आरोपांना राजेश क्षीरसागर यांनी उत्तर दिले असते, तर ते मला मान्य असते. मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिवसेनेवर बोलण्याची गरज काय? त्यांनी शिवसेनेच्या बाजूने बोलायचा ठेका घेतला आहे का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. असा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.