जिल्हÎातील पंचनामे पूर्ण, 6392.23 हेक्टर क्षेत्र 33 टक्के बाधित, कृषी विभागाकडून अहवाल तयार
कोल्हापूर : कोट-वाकुरे फोटो केओपी डाटा नावाने आहे.
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हÎातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून 6 हजार 391 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये 55 हजार 679 शेतकऱयांचे 6 कोटी 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पन्हाळा तालुक्यातील 23 हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाले आहे. जिल्हÎातील 6392.23 हेक्टर क्षेत्र 33 टक्के पेक्षा अधिक बाधित आहे. असा अहवाल कृषी विभागाने तयार केला असून. येत्या अठवडÎाभरात शेतकऱयांच्या खात्यावर मदत जमा होण्याची शक्यता आहे.
यंदा वर्षभर अतिवृर्ष्टी सुरु आहे. जून ते ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या कळात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले. भात, सोयाबीन, फळबागा, आदी काढणीला आलेली पिके वाया गेली. शेतकऱयांतून नुकसान भरपाईची मागणी होवू लागल्यानंतर पंचनामे करण्यात आले. कृशी विभागाच्या नजर अंदाजाच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटींची मदत घोषीत केली.
जिल्हÎातील नुकसानभरपाईचे चित्र
कालावधी शेतकरी हेक्टर रक्कम
जून ते ऑगस्ट 20700 2351 2.49 कोटी
सप्टेंबर 1047 115 10 लाख
ऑक्टोबर 32924 3899 3.49 कोटी
पात्र शेतकऱयांना मदत मिळणार
कृषी विभागाकडून नजर अंदाज पहाणी करुन शासनाला नुकसानीची आकडेवारी सादर केली आहे. अजून काही ठिकाणी पंचनामे सुरु आहेत. पात्र सर्व शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधिक्षक