एम.एस.सी. बॅंक,के.डी.सी.सी.बॅकेंचे सहकार्यः,कागलमध्ये पाचवा कारखाना गाळपास सज्ज, संजयबाबा गटाला मिळणार मोठे बळ
व्हनाळी : सागर लोहार
कागल तालुक्यात आता पाचवा साखर कारखाना गाळपास सज्ज झाला आहे. शिवाय इतर साखर कारखान्याप्रमाणे या कारखान्यात साखरेबरोबरच केमिकल्स विरहीत आरोग्यदाई गुळ पावडर तयार होणार आहे. या कारखान्यामुळे राजकारणातून हाल अपेष्ठा सोसलेल्या निष्ठावंत संजयबाबा घाटगे गटाला मोठी उभारी मिळणार आहे. श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. केनवडे ता.कागल या साखर कारखान्यामुळे तालुक्यात प्रत्येक गटाचा स्वतःचा हक्काचा साखर उभारला आहे. तालुक्य़ात पहिला बिद्री साखर कारखाना उभारणी झाली असली तरी या कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल पेक्षा राधानगरी,भुदरगड मध्ये जास्त आहे. तसेच सहकारी तत्वावरील तालुक्यात दुसरा सर्वात जुना शाहू साखर कारखाना दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांनी उभारला आहे. त्यानंतर दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी हमिदवाडाच्या माळावर तिस-या क्रमांकाचा साखर कारखाना उभा केला आहे. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील स्वताच्या कार्यकर्त्यांची कुचंबना होवून नये म्हणून कागल तालुक्यात चैाथ्या बेलेवाडी काळम्मा या ठिकाणी खासगी तत्वावरीव साखर कारखान्याची उभारणी केली.
संजयबाबा घाटगे यांच्या कडे कोणतीही मोठी आर्थिक सत्ता नसल्यामुळे आजपर्यंत स्वताचा कारखाना उभारता आला नव्हता.मात्र स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फैाज आणि त्यांना सांभाळण्याची हातोटी जी त्यांचे सर्व विरोधकही मान्य करतात. यामुळेच संजयबाबा घाटगे गटाने आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रास्तव स्वतःचा साखर कारखाना उभारणीची घोषणा केली. आणि त्यांच्या या घेषणेला कार्यकर्त्यांनी पाठबळ दिल्याने आल्पावधीतच कारखाना उभारला त्याचे येत्या पंधरा दिवसात ट्रायल सिजन सुरू होणार आहे. त्यामुळे अन्नपुर्णा शुगर उभारणीचे संजयबाबा घाटगे गटाचे स्वप्न साकार झाले असल्याने कार्यकर्त्यात उत्साह निमार्ण झाला आहे.
केनवडे ता.कागल येथे 18 एकर जागेवर डोंगर फोडून तो समपातळीत आणून या कारखान्याची उभारणी पुर्ण झाली आहे. कारखाना उभारणीसाठी सुमारे 50 कोटी रूपये खर्च असून त्यामध्ये शेतक-यांनी 12 हजार शेअर्स घेतले असून उर्वरीत शेअर्स विक्री चालू आहे. कारखाना उभारणीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे प्रदुषानाचा कोणताही त्रास या परिसराला होणार नाही. याची योग्य ती काळजी घेण्यात आली आहे.
कारखान्याची रोजची गाळप क्षमता 1500 मेट्रीक टन असून त्यासाठी लागणा-या ऊसाची उपलब्धता ही संजयबाबा घाटगे यांच्या अन्नपुर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्था व्हनाळी,साके,केनवडे,गोरंबे, सावर्डे,हदनाळ या 5 हजार एकर कमांड एरिया असलेल्या कार्य़क्षेत्रातील गावातून होण्याचे नियोजन केले आहे. शिवाय तालुक्यातून कार्यकर्त्यांच्या येणा-य़ा ऊसालाही तेवढेच प्राधान्य राहणार आहे. सध्या ऊसतोडणी,वहान करार या सर्व प्रक्रीया पुर्ण झाल्या असून तालुक्यीतील 7 ठिकाणी शेती विभागीय कार्यलये कार्यरत झाली आहेत. येत्या पंधरा दिवसात प्रत्यक्ष गाळपाला सुरूवात होणार आहे. कारखाना उभारणीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बरोबरच एम.एस.सी बॅंकेकडून कर्ज मजूरीसाठी बॅकेंचे चेअरमन अनासकर साहेब, तसेच मा.आम.सुरेश हाळवणकर, संचालक महागावकर साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले शिवाय. सुमारे पंचवीस वर्षातील पारंपारिक राजकिय हाडवैर विसरून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी जिल्हा बॅंकेतून कर्ज देवून मोठी मदत केली आहे. ज्यामुळे कागलच्या राजकीय विद्यापीठातील राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यत निमार्ण झाली आहे. पंरतू या सर्व घडामोडित राजकारणामुळे हाल अपे।ष्ठा सोसलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र या सर्वामुळे चांगले दिवस येणार आहेत येवढे मात्र नक्की…
कारखान्यात नवतंत्रज्ञानाचा वापर
अन्नपुर्णा शुगर कारखाना उभारणीत अधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. या कारखान्यात केमिकल विरहीत जॅगरी पावडर,साखर निमिर्ती होणार आहे जीचा औषध निमिर्ती मोठा वापर होतो शिवाय आरोग्यासाठीही जॅगरी पावडर उपयुक्त आहे त्यामुळे शेतक-यांना चांगला फाय़दा होणार आहे. – संस्थापक : माजी आमदार संजयबाबा घाटगे