रोहीत ताशिलदार / गडहिंग्लज
गेल्या वर्षभरापासून शाळा पुर्णपणे बंद असल्याने 2020-21 हे शैक्षणिक वर्ष वाया जाणार अशी भिती मनात असताना राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने गडहिंग्लज तालुक्यातील सरकारी आणि खासगी शाळेतील पहिली ते आठवीचे 28 हजार 819 विद्यार्थी विना परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे विद्यार्थी मात्र जाम खूष झाला असला तरी पालकांच्यावर चिंतेचे मळभ दिसत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्यात चिंतेचे वातावरण होते. कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान फार मोठे असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा कमी होण्याची चिन्हे पालकांनी व्यक्त केली होती. राज्यात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर शासनाने शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला.
पहिल्या टप्प्यात पाचवी ते आठवडी पर्यंत वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले. सामाजिक आंतर ठेवत वर्ग सुरू करून सुध्दा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभलेला नव्हता. काही काळ कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने पाचवी ते आठवीचे वर्ग पुर्ण क्षमतेने भरण्यात आली. ऐच्छिक असल्याने सुरूवातीस वर्गात विद्यार्थ्यांची संख्या दिसली पण पुन्हा संसर्ग वाढू लागल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न जावू देता ऑनलाईन शिक्षण घेणे पसंत केले. कमी कालावधी मिळाल्याने शिक्षण विभागाने अभ्याक्रमातही 25 टक्क्याने कमी करण्यात आला होता. अनेक निर्णयामुळे शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा पहायला मिळाला. दररोज अनेक निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये उत्साह नसल्याने पालकांच्यामध्ये नाराजी व्यक्त होती. त्यानंतर परिक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावर बरेच मतांतर झाल्यानंतर परिक्षा अखेर रद्द करण्यात आल्या.
कोरोनामुळे शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना परिक्षा घेणे योग्यच नसल्याचे तज्ञांनी मत व्यक्त केले होते. यासर्व बाबीचा विचार करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 3 एप्रिल रोजी पहिली ते आठवीपर्यंत विनापरिक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे काही पालकांनी विरोध करत संसर्ग कमी झाल्यानंतर घ्यावे अशी मागणी होत आहे. या निर्णयामुळे गडहिंग्लज तालुक्यातील पहिली ते आठवीचे 28 हजार 819 विद्यार्थी विनापरिक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
पहिली 2687
दुसरी 2711
तिसरी 2927
चौथी 2865
पाचवी 4167
सहावी 4108
सातवी 4029
आठवी 5325
एकूण 28819
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले खरे आहे. वाढत्या कोरोनाचा संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त होती. वर्ग सुरू नसताना शासनाने विनापरिक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय योग्यच आहे. पालक – सतिश अर्जुनवाडे, बड्याचीवाडी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून हे नुकसान न भरून निघणारे आहे. आता शिक्षणमंत्र्यानी परिक्षाविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुले अभ्यास करणार नाहीत. शासनाने कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर किमान चौथी पासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांची परिक्षा घ्यावेत. पालक – सुजाता मांगले, गडहिंग्लज |