वाकरे / प्रतिनिधी
वाकरे गावाने केलेल्या नागरी सत्कारामुळे आपल्याला ऊर्जा मिळाली असून येत्या सहा वर्षांत आमदारकीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रासाठी चांगले काम करणार आणि पंचक्रोशीचे नाव उज्वल करणार अशी ग्वाही पुणे शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी दिली.
वाकरे (ता. करवीर) येथील मुख्य चौकात ग्रामपंचायत, सर्व सहकारी संस्था,शाळा, तरुण मंडळे,सर्व शिक्षक,विद्यार्थी,आशा वर्कर्स ,अंगणवाडी सेविकाआणि ग्रामस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार समारंभ आणि ग्रामपंचायतीच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्टोअर रूमच्या उद्घाटनप्रसंगी आमदार आसगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वसंत तोडकर होते.
आमदार प्रा.आसगावकर यांनी आपले वाकरे गावाशी जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगून पंचक्रोशीतील सर्वांनी आसगावकर मीच आहे असे समजून प्रचार केला,पंचक्रोशी आणि वाकरे गावाच्या प्रेमामुळे आपल्याला विजय मिळाला असे ते म्हणाले.
सौ.अनू आसगावकर यांनी शिक्षकांबरोबरच सामान्य लोकांची तीव्र इच्छा असल्याने जयंत आसगावकर आमदार झाल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा.एस.पी.चौगले यांनी केले. यावेळी कुंभीचे संचालक अनिल पाटील, प्रेक्षाराणी शिंदे, उपसरपंच शारदा पाटील, संचालक वाय.एम.कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार आसगावकर यांचा सरपंच वसंत तोडकर यांच्या हस्ते तर अनु आसगावकर यांचा उपसरपंच शारदा पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. आभार मुख्याध्यापक पी.एस.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला के.डी.माने, राऊसो पाटील, बळवंत पाटील, शिवाजी तोडकर, विलास पाटील,मधुकर तोडकर,प्रा.एस.ए.पाटील, प्रा. बी.एल.पाटील, प्रा.वसंत पाटील,प्रा.रघुनाथ मोरे ,मारुती बिरंजे,मुख्याध्यापक बी.बी.पाटील, एस.डी.लाड, सौ.सविता पाटील, भगवान सूर्यवंशी, के.वाय.माने,महादेव पाटील, नामदेव पाटील,गणेश गुरव, बुद्धपा कांबळे,डॉ.श्वेता तोडकर, तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.गावातील सर्व संस्था, मंडळे, शाळांच्या वतीने सत्कार करण्यात आला.आमदार आसगावकर यांची मुलींच्या लेझीम पथकाच्या निनादात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली.
५० टक्के मते आपल्याला
आमदार आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघात एकूण ३५ उमेदवार होते,त्यामध्ये आपल्याला ५० टक्केपेक्षा जास्त मते तर उर्वरित ३४ उमेदवारांना ५० टक्के मते मिळाल्याचे सांगितले,त्यामुळे आपला विजय सुकर झाल्याचे ते म्हणाले.