जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने, जिल्हाधिकाऱयांना मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुर्ववत करावे, मागासवर्गियांना पदोन्नती द्यावी, अशी मागणी आरक्षण हक्क कृती समितीने शनिवारी जिल्हाधिकाऱयांकडे केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना देण्यात आले.
आरक्षण हक्क कृती समितीने दिलेल्या निवेदनात ओबीसी आणि मागासवर्गियांच्या मागण्यांसाठी यापुर्वी निवेदने दिली. तसेच बैठक घेण्याची मागणी केली, त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. या दोन्ही समाजात सरकारविरोधात असंतोष आहे. तरी मागासवर्गियांना पदोन्नती द्यावी, कामगार हिताविरोधी असलेले 4 कायदे रद्द करावेत, परदेशी शिष्यवृत्तीसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करावी, उच्च शिक्षणासाठीची फ्री शिप पुर्ववत सुरू करावी, बॅकलॉग भरतीसाठी विशेष भरती मोहीम राबवावी, लॉकडाऊन काळात सर्वांना मोफत रेशन मिळावे, बलुतेदारांना आर्थिक सहाय्य करावे, आदी मागण्या केल्या आहेत.
मोर्चामध्ये आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक प्रकाश श्रावस्ती, रविकिरण गवळी, संतोष आंबेकर, आनंद खामकर, प्रा. शहाजी कांबळे, रूपा वायदंडे, उत्तम कांबळे, सुखदेव बुद्धÎाळकर, प्रताप बाबर, प्रेमानंद मौर्य, जी. बी. गुडासकर, संजय पोवार, डॉ. बबन जोगदंड आदी सहभागी झाले होते.