महाविकास आघाडीच्या नेत्यांना राजेश क्षीरसागर यांचा इशारा
कोल्हापूर/प्रतिनिधी
सर्व निवडणुकीत शिवसेना सोबत पाहिजे. मग आता काँग्रेसने पत्रक काढून सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेना देखील या मतदार संघात लढणार, कोल्हापूर उत्तर ही शिवसेनेच्या मालकीची आहे. असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांना दिला आहे. ते आज शिवसेनेच्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते.
राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बोलताना, २००४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुरेश साळुंखे यांचा पराभव केला असल्याचे सांगितले. पुढे म्हणाले, शिवसेना अजून संपलेली नाही. मात्र शिवसेनेबरोबर गद्दारी केलेले सगळे संपले. प्रत्येक शिवसैनिकाने संघटन वाढवले पाहिजे. गद्दार कधीही या जगात टिकले नाहीत, असेही क्षीरसागर म्हणाले.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागे वळून पाहावे. पदवीधर मतदार संघात शिवसैनिक प्रचारासाठी रस्त्यावर होते. मात्र चंद्रकांत पाटलांनी २०१९ च्या निवडणुकीत युतीधर्म पळाला नाही, अशी अप्रत्यक्ष टीका क्षीरसागर यांनी केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेना म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. विरोधकांनी सातत्याने माझी बदनामी केल्यामुळेच गेल्या निवडणुकीत पराभूत झाला. माझा पराभव झाला याचे वाईट वाटले नाही. पण शहराचा विकास थांबला याचे वाईट वाटत असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आजारी असतांना भाजपकडून टीका केली जाते. राज्यातील संस्कृती भाजपने मोडून काढली आहे. कंगना रणावतला झेड प्लस सुरक्षा पुरवली जाते. आशा पद्धतीने भाजप राजकारण करत आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.
गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांचा आदेश नेत्यांनी डावलला. काँग्रेसने आज परिपत्रक काढले आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा संयुक्त लढणार नाही. पण आम्ही पण या मतदार संघात लढू, कोल्हापूर उत्तर मतदार संघ हा शिवसेनेच्या मालकीचाच आहे. असा ठाम इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. काही ऐहसान फरामोश माझ्याकडून निघून गेले आहेत. मात्र सामान्य शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय देतील त्यावर आम्ही पुढील दिशा ठरवू असेही क्षीरसागर म्हणाले.