काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यांची मागणी
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी विविध विकासकामांवर चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या लसिकरणासाठी असणारी शासकीय, खासगी हॉस्पिटल व आरोग्य केंद्रे ही शहराच्या मध्यवस्तीत आहेत. तेथे लसिकरणासाठी गर्दी होत आहे. उपनगरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यांनाही इतर नागरिकांप्रमाणे शहराच्या मध्यवस्तीतील हॉस्पिटलमध्ये येऊन कोरोनाची लस टोचून घ्यावी लागत आहे. ऐन गर्दी आणि ऐन उन्हाळÎात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उपनगरात कोरोना लसिकरण केंद्रे सुरू करा, अशी मागणी महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱयांनी बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली.
माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक विनायक फाळके, सुयोग मगदूम, अश्पाक आजरेकर यांनी बुधवारी सायंकाळी प्रशासक डॉ. बलकवडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी शहरातील प्रलंबित विकासकामे, महापालिकेच्या योजना आणि केएमटीच्या कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱयांचे वेतन व इतर मुद्द्यांवर चर्चा केली.
शारंगधर देशमुख यांनी कोरोना लसिकरणाची सुविधा असणाऱया हॉस्पिटल व आरोग्य केंद्रांपैकी बहुतांश शहराच्या मध्यभागात आहेत. शहराच्या उपनगरात त्यांचे प्रमाण अत्यल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे उपनगरातील ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांना शहराच्या मध्यवस्तीतील हॉस्पिटल, आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी यावे लागत आहे. त्यांना त्रास आणि अडचणींना सामोरे जावे लागते. उपनगरात लसिकरणाची सुविधा द्यावी, अशी मागणी होत आहे. महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. चार प्रभागात मिळून जर एक केंद्र सुरू केले तर गर्दी होणार नाही, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी यावेळी केली.
शहरातील नगरोत्थान आणि दलितवस्ती व इतर वस्ती सुधार योजनांसाठी निधी मंजूर आहे. जिल्हा नियोजन समितीची प्रशासकीय मान्यता घेऊन ही विकासकामे तातडीने सुरू करावीत, महापालिका निवडणूक आचारसंहितेत ही कामे अडकू शकतात. त्याआधी प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
केएमटीकडे कार्यरत असणाऱया रोजंदारी कर्मचाऱयांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यात यावा. त्याचबरोबर केएमटीकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार गेली पाच ते सहा वर्षे दहाहजार रूपयेच आहे. त्यामध्ये दोन हजार रूपयांची वाढ करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
निधी परत जाऊ नये यासाठी कामे पूर्ण करा
टर्न टेबल लॅडर, कॉम्पोनंट ब्लड बँक, पाणी पुरवठÎाच्या काही योजनांसाठी असणारा निधी मार्च एंड अखेर जर निधी खर्च झाला नाही तर तो शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी संबंधित प्रकल्प, योजना तातडीने पूर्ण करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार स्थलांतरीत करण्यात यावा, शहरातील निकम पार्क परिसरासह इतर भागात पावसाळÎात पाणी शिरते. ते बंद करण्यासाठी जो निधी मंजूर आहे, त्यानुसार कामे करण्यात यावीत, एलबीटी वसुली योग्य पद्धतीने करावी, महापालिकेच्या आरक्षित जागा ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरात कचऱ्याचा प्रश्न, आरसी गाड्यांची संख्या वाढवा
शहरातील कोंडाळ्यातून ( पंटेनरमधून ) कचरा उचलून झूम प्रकल्पात डंप करणाऱया केवळ दोनच आरसी गाड्या सध्या सुरू आहेत. इतर आरसी गाड्या नादुरूस्त आहेत, त्यामुळे शहरातील कोंडाळे ओव्हर फ्लो होत आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. आरसीगाड्यांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी, तसेच उर्वरीत 69 टिपरची निविदा काढली आहे. प्रक्रिया पूर्ण करून टिपर आणण्यात यावेत, कोंडाळामुक्त शहरसाठी टिपर सेवा महत्वाची आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामुळे विविध विकास कामे, योजनांसाठी शासनाकडून महापालिकेला निधी मिळाला आहे, पण महापलिका प्रशासनाकडून गतिमान प्रक्रिया राबविली जात नसल्याने कामे वेळेत सुरू आणि पूर्ण होत नाही. याबाबत सभागृहातही अनेक वेळ चर्चा झाली आहे. आजच्या बैठकीत निधी परत जाऊ नये, यासाठी कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. -शारंगधर देशमुख, मनपातील काँग्रेसचे माजी गटनेते