शिरोळ / प्रतिनिधी
घेतलेल्या कर्जाचा विनियोग चांगल्या प्रकारे करून आपली प्रगती साधावी व आपली पत बँकेत निर्माण करून जास्तीत जास्त वेगवेगळे योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे भारतीय स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर संजय श्रीवास्तव यांनी केले.
येथील भारतीय स्टेट बँकेच्या वतीने आत्म निर्णय भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री स्वनिधी मंजूर पत्राचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले की भारतीय स्टेट बँक अनेक योजना राबविल्या आहेत शेतकरी बांधवांसाठी कृषी सोनेतारण ,पिक कर्ज छोट्या उद्योजकांना कर्ज यांसह अन्य योजना राबवण्यात आल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा घेतलेले कर्ज वेळेत फेडल्यास शासनाच्या अनेक सवलतीचा लाभ होणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शाखाधिकारी हनुमंत कुराडे यांनी केले या कार्यक्रमास विभागीय क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख विनोद कुमार, ओमप्रकाश बारापात्रे ,संजय साळवी ,कृषी अधिकारी प्रकाश शिंदे, मंदार वाघ, संदीप पांडव यांच्यासह अधिकारी कर्मचारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार मंदार वाघ यांनी मानले