वार्ताहर / कुंभोज
कुंभोज, बाहुबली येथील दुगामाता नवरात्र उत्सवाला मोठी परंपरा आहे. दरवर्षी मोठ्या भक्तिभावात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यावर्षी कोरोनामुळे या उत्सवाला साधे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्या दृष्टीने प्रत्येक मंडळांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली असली तरी भक्तिभाव तोच कायम आहे. परिणामी गावातील बिरदेव मंदिर, शाकंबरी मंदिर, महादेव मंदिर हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर, जैन बस्ती, बंद असल्याने नागरिकांना शिखराच्या दर्शनाने समाधान मानावे लागत आहे. परिणामी मंदिर व्यवस्थापनाने मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून संचारबंदीचे पालन करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
यंदा कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शासनाने सूचना दिलेल्या आहेत. परिणामी कुंभोज मध्ये कोरणाचा गेल्या दोन महिन्यातील वाढता प्रभाव पाहता कुंभोज कोरोण्याच्यादृष्टीने हातकणंगले तालुक्यात हॅटस्पोट गाव ठरले होते. परिणामी आरोग्य यंत्रणा व शासकीय यंत्रणा यांच्या सहकार्यामुळे कुंभोज आज कोरोणा मुक्तीकडे वाटचाल करत असून सगळे गाव कोरोणा मुक्त होण्यासाठी ग्रामपंचायत कुंभोज हातकणंगले पोलीस स्टेशन यांनी नवरात्र उत्सव अत्यंत साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते.
त्या आव्हानाला कुंभोज बाहुबली नेज हिंगणगाव परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी कोणत्याही पद्धतीचे डामडौल न करता नवरात्रोत्सवाला अत्यंत साध्या पद्धतीने सुरुवात झाली. शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीने गावातील काही तरुण मंडळी यांना नियमावली घालून दिली असून त्यानुसार देवीची मूर्ती चार पफुटांच्या वर नसावी, घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असावी अशा मर्यादा निर्धारित करण्यात आल्या आहेत. सांसकृतिक कार्यक्रम टाळून स्वच्छता, जनजागृतीपर कार्यक्रम राबवावे, आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी टाळावी,ध्वनिप्रदूषण टाळावे, मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी, मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास मनाई करण्यात आली आहे
विजयादशमीच्या दिवशी करण्यात येणारा कुंभोजचा दसरा महोत्सव कार्यक्रम सर्व नियम पाळून संचारबंदीचे पालन करणारा असावा. सिमाउलगणासाठीआवश्यक तेवढ्याच व्यक्ती उपस्थित राहण्याच्या सूचनाआहे. या संदर्भात सर्व मंडळांनाही कळविण्यात आले आहे. परिणामी दुर्गामाता मंडळात येणार्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान व ऑक्सिजन तपासणे, सॅनिटायझर मारणे, मास्क लावणे, डिस्टन्स ठेवणे, ५ हजार मास्कचे वाटप, यावर्षी आरोग्य शिबिर होणार आहे, सर्व मंडप रोज सॅनिटाइझ करतील, आचारी व प्रसाद तयार करणारे यांचे ऑक्सिजन व तापमान तपासूनच त्यांना काम देण्यात येईल. परिणामी यावषी नवरात्रोत्सवातील रोजगार बुडाला असुन नवरात्रोत्सवादरम्यान होणारे विविध कार्यक्रम, गरबा,भक्तांची देवीच्या मंदिरामध्ये होणारी गर्दी यामुळेअनेकांना रोजगार मिळत असे. फुलवाले, प्रसाद विक्रेते,मंडप डेकोरेशन, अशा अनेकांचा रोजगार कोरोनाच्या संकटामुळे बुडाला आहे. दरवर्षी या कालावधीत होणार्या उत्पन्नाला व्यावसायिकांना मुकावे लागले आहे.
स्थानिक प्रशासनाचे नियम व अटी गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, आरोग्य शिबिरे घ्यावी मिरवणूक काढू नये, मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी, ऑनलाइन दर्शनासाठी मंडळाने नियोजन करावे.राज्य शासनाने उत्सव साजरा कसा करावा, याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांची माहिती सर्व मंडळांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.प्रत्येकाने नियमांचे पालन करूनच शांततेत उत्सव साजरा करावा. असे आदेश हातकणंगले पोलीस निरीक्षक अशोक भवड यांनी बैठक घेऊन व निवेदनाद्वारे दिले आहेत.