तीन जनावरे ही मृत्युमुखी, धामणी खोऱ्यात हळहळ
म्हासुर्ली /वार्ताहर
कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी (ता.राधानगरी) येथे जोरदार ढगफुटी सदृश पावसामुळे काल गुरुवार रात्री साडेअकराच्या सुमारास डोंगराचे भूस्खलन झाल्याने दोन घरे जमिनदोस्त झालीत.परिणामी सदर घरांच्या भरावाखाली सापडून वसंत लहू कुपले (वय ४८) व सुसाबाई वसंत कुपले(वय ४२) या पती-पत्नीचा दुदैवी मृत्यू झाला.तर गोठ्यातील तीन जनावरे ही मृत्युमुखी पडली असून सदर घटनेने धामणी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
धामणी खोऱ्यात गेल्या दोन – तीन दिवसापासून पावसाची अतिवृष्टी सुरुु आहे.काल गुरुवारी संध्याकाळ पासून मुसळधार पावसाने जोर दिल्याने धामणी खोऱ्यात नागरिक भितीच्या छायेेत होते.त्यातच रात्री दहा नंतर आकाशात ढगाचाा गडगडाट होऊन धुवाधार पावसास सुरुवात झाली.
तर रात्री ११.३० च्या सुमारास झालेल्या पावसाने कोनोली पैकी कुपलेवाडी येथील डोंगराचे भूस्खलन होऊन लगतच्या घरांवरती माती,चिखल, झाडे यांचा भराव येऊन दोन घरे पूर्णतः मलम्यात गाढली गेली.तर तीन घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
ही घटना समजताच ग्रामस्थांनी बचाव कार्यास सुरुवात केली.मात्र जोराचा पाऊस, सर्वत्र असणारी पूरपरिस्थिती व पसरलेला अंधार यामुळे बचावकार्याला अडथळे आले. तर शुकवार सकाळपासूनच पुन्हा बचावकार्य सुरू केले. त्यानंतर जेसीबी मशिन आणून दुपारच्या सुमारास मृतदेह भरावा खालून काढण्यास प्रशासन व ग्रामस्थांना यश आले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.तर कुपले दाम्पत्यांच्या व जनावरांचे मृतदेहाचे शवविच्छेदन मंडल अधिकारी देवीदास तरडे, ग्रामसेवक समीर ठिकपूर्ले, म्हासुर्लीचे ग्रामसेवक विराज गणबावले यांच्या उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांनी जाग्यावरच करण्यात आले. कुपले यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.