प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील कोगे, महे,व पाडळी खुर्द या गावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. काही ठिकाणी चुरस, तर काही ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज, या जोरावर गावागावांमध्ये दुरंगी लढत होत आहे. प्रत्येक गावातील आघाडीने आता दोन दिवस राहिल्याने पदयात्रेतवर भर दिला आहे. पाडळी खुर्द शेतकरी सहकारी संघ यांचे चेअरमन व कोगे गावात कुंभी कासारी साखर कारखाना संचालक विरुद्ध स्थानिक गट अशी लढत आहे. महे गावांमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून सज्जन तुकाराम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. म्हणजेच एकूण 11 उमेदवारांपैकी 1 उमेदवार निवडून आलेला आहे .बाकीचे 10 उमेदवार म्हणजेच बुद्धीराज पाटील यांची भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल(काँग्रेस), विरुद्ध पांडुरंग पाटील, व सर्जेराव हुजरे (शिवसेना) श्री भैरवनाथ जनसेवा आघाडी अशी थेट लढत होत आहे. थोडक्यात काँग्रेस पक्ष विरुद्ध शिवसेना पक्ष अशी थेट दुरंगी होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक आघाडीने पदयात्रेवरती भर दिला आहे. प्रत्येक मतदाराला भेटून आम्हाला मतदान करा अशा विनवण्या केल्या जात आहेत. जाहीर प्रचार करायच्या शेवटच्या दिवशी घर टू घर भेटी दिल्या जात आहेत. काही ठिकाणी जेवणावळी ,भेट वस्तू, तर काही ठिकाणी पैशाचे आमिष दाखवून आपल्याला मतदान कसे मिळेल? याकडे प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. एकंदरीत मतदार राजाला खुश करून आपल्याला मतदान मिळेल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. मात्र मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देईल? हे मतपेटीतून स्पष्ट होईल.