सीपीआरचे हृदयरोग उपचार विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांचे मत ः काळजी, दक्षता घेण्याचा सल्ला
प्रतिनिधी / कोल्हापूर:
कोरोना रुग्णांची संख्या जरूर झपाटÎाने कमी झाली आहे. मृतांचे प्रमाणही घटले आहे .पण हे सारे खरे असले तरीही कोरोना निघून गेला या समजुतीत आपण मुक्त वावरत राहिलो तर परिस्थिती पुन्हा चिंतेची होऊ शकणार आहे. असे स्पष्ट मत छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळाच्या हृदय रोग उपचार विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांनी आज `तरुण भारत’शी बोलताना व्यक्ते केले. ते म्हणाले, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले ही या क्षणाची समाधानाची बाब आहे. पण आता कोरोनाची काळजी करायची नाही असे म्हणत आपण वावरू लागलो तर सुपर ऍडेड कोरोनाचा संसर्ग विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना व अन्य आजाराने ग्रासलेल्या लोकांना टाळता येणार नाही.
ते म्हणाले कोरोना संसर्ग कमी झाला याचे कारण योग्य उपचार हे तर आहेतच .पण लोकातील प्रतिकारशक्तीही वाढल्याचे ते एक प्रमाण आहे. उदाहरणार्थ एक लाख लोकसंख्येपैकी 33 हजार लोकांना कळत नकळत कोरोनाचा संसर्ग होऊन गेला असण्याची शक्यता आहे. त्यांच्यात स्वप्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे गेले काही महिने रोज अमर्याद संख्येने संसर्ग होणाया रुग्णांचे प्रमाण नक्की कमी झाले आहे. छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतील असे बेड आहेत. रुग्णांची त्यांच्या नातेवाईकांची दवाखाना शोधण्यासाठी होणारी धावपळ थांबली आहे.
पण याच वेळी एक जाणवते की, ज्येष्ठ नागरिक की ज्यांना अन्य गुंतागुंतीच्या आजाराने ग्रासले आहे त्यांना कोरोना चा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. किंबहुना त्याच स्वरूपाचे रुग्ण सध्या ऍडमिट आहेत .आता दीपावली जवळ आली आहे. फटाक्यांचा धूर दम्याचा विकार असलेल्यांना खूप धोकादायक आहे .अशात त्यांना कोरोना चा संसर्ग झाला तर तो सुपर ऍडेड कोरोना खूप चिंतेचा असणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू न देणे हे आवश्यक नव्हे तर अत्यावश्यक आहे. अन्य काही देशात कोरोना निघून गेला असे वातावरण होते पण तेथेही को रोना परत उफाळून आला आहे. तशी वेळ आपल्याकडे येऊ द्यायची नसेल तर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जेवढी घेता येईल तेवढी खबरदारी आवश्यक आहे. व ती खबरदारी घेणे आपल्या हातात आहे.
आता दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्याची जाणिव बाजारपेठेतील गर्दीवरून जाणवू लागली आहे. दिवाळी जरूर आनंदाचा क्षण आहे पण हा सण पुढेही आनंदाने साजरा करता यावा म्हणून आता थोडÎा मर्यादा पाळणे आवश्यकच आहे. कोरोना केवळ तोंडाला मास्क बांधला म्हणून जात नाही. संपर्क टाळणे, वेळोवेळी हात धुणे, अनावश्यक कारणासाठी बाहेर न पडणे हे आजही पाळणे गरजेचे आहे. पण कोरोना गेला अशाच समजुतीत बहुतेकजण कोल्हापुरात वावरताहेत. -डॉ. अक्षय बाफना.