उद्या मतमोजणी, सत्ताधारी, विरोधकांचे जोरदार रस्सीखेच, दोन्ही आघाड्यांकडून बहुमताचा दावा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंत्यत चुरशीने 99.78 टक्के मतदान झाले. 3656 पैकी 3639 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 3 ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 8 ठरावधारक मतदानाकडे पाठ फिरवली. 21 जागांसाठी 45 उमेदवार नशिब आजामावत आहेत. रात्री उशिरा मतमेटÎा रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात जमा करण्यात आल्या आहेत. शाहूवाडी, करवीर येथे कोरोना बाधित चार मतदारांनी पीपीई किट घालून मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक डॉ. गजेंद्र देशमुख, शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवार 4 रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून दुपारी बारा पर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
दुपारी 12 पर्यंतच 90 टक्के मतदान
जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघासाठी सत्ताधारी विरोधी आघाडीत अतितटीची लढत झाली. सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील 12 तालुक्यामधील 70 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु झाली. मात्र सकाळी दहा पर्यंत तुरळक मतदान झाले होते. अकरानंतर वाहनांच्या ताफ्यातून ठरावधारक केंद्रावर दाखल होत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीने मतदान झाले. दुपारी बारा पर्यंत अवघ्या एक तासात जवळपास 90 टक्के मतदान झाले होते. पाच वाजेपर्यंत 99. 78 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी निर्बंध घातले. पण गोकुळच्या आजच्या मतदानावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले. यामुळे सोशल मीडियावर या निवडणूक प्रक्रियेवरच सडकून टीका होत होती.
असे झाले तालुकानिहाय मतदान
तालुका मतदान झालेले
आजरा 233 232
करवीर 639 639
कागल 383 383
गगनबावडा 76 75
गडहिंग्लज 272 272
चंदगड 346 246
पन्हाळा 354 354
भुदरगड 373 369
राधानगरी 458 457
शाहुवाडी 286 285
शिरोळ 133 133
हातकणंगले 95 95
एकुण 3647 3639
राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची एकहाती सत्ता
गोकुळ व्यापाऱ्यांच्या माध्यमातून भाजपच्या हातात न जाता शेतकऱ्यांच्या ताब्यात राहावा ही भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मतदारच परिवर्तन घडवणार आहेत. 2280 हून अधिक ठरावधारक आमच्यासोबत होते. त्यामुळे विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा विजय निश्चित आहे.
सतेज पाटील पालकमंत्री, तथा प्रमुख राजर्षी शाहू शेतकरी आघाडी
पुन्हा आम्हीच येणार…
गेली तीस वर्षे शेतकऱयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याबाहेरही आमच्या दराची चर्चा आहे. गेली काही निवडणुकीत आमच्यातील काही मंडळी फुटून विरोधकांना मिळत आल्या आहेत. मात्र आमचे पॅनल निवडून येण्याचे थांबले नाही. दूध उत्पादक आमच्या सोबत असल्याने पुन्हा आम्हीच सत्तेवर येवू
आमदार पी. एन. पाटील, सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी