प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वच्छ भारत अभियान ( ग्रामीण ) अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर जिल्ह्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सरपंच संवाद आणि पुरस्कार वितरण केले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास का येथून जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, सीईओ अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गत विविध निकष ठरविण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांनी सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा 20 जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याशी सवांद साधला.