शासन निर्णयानुसार शिवराज्याभिषेक दिन होणार साजरा, जि.प.च्या प्रांगणात उभारली जाणार स्वराज्य गुढी
विविध उपक्रमांचे केले जाणार आयोजन
प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचा दिवस (6 जून) यंदाच्या वर्षीपासून `शिवस्वराज्य दिन’ म्हणून सर्व ग्राम पंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद मध्ये साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मुख्यालयासमोर `शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारली जाणार आहे. जिह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेत विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत `शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारली जाणार आहे. तसेच सर्व ग्राम पंचायत व पंचायत समितीच्या प्रांगणात देखील `स्वराज्य गुढी’ उभारली जाणार आहे. त्याचबरोबर शिवराज्यभिषेक सोहळा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे, मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, पोवाडा तसेच चित्रकर्ती डॉ. अल्पना चौगुले यांनी जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना शिव राज्यभिषेक सोहळ्याचे तैलचित्र प्रदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार होणार आहे. कोविड योध्दा कै. सुरेश निंबा देशमुख, (परिचर) यांच्या वारसांना राज्यशासनाने मंजूर केलेले 50 लाख रुपयांचा धनादेश वितरण करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमास जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतिश पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासणे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचाऱयांची मर्यादित उपस्थिती राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासकीय नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे.