प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुळ व्यवसायातून प्रतिवर्षी पाचेश ते सातशे कोटींची उलाढाल होते. मात्र सध्या हा व्यवसाय अनेक समस्यांना तोंड देत सुरु आहे. यामुळे गुऱहाळ घरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गूळ व्यवसायाला चालन देण्यासाठी आपण लक्ष घालून उपाययोजना राबवा. जिल्ह्यातील गूळ व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. मागणीचे निवेदन राज्यकृषी मंत्री दादासो भुसे यांना दिले.
राज्यकृषी मंत्री दादासो भुसे रविवारी कोल्हापूर दौऱयावर होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, संभाजी पाटील यांनी कृषीमंत्री भुसे यांची भेट घेवून त्यांच्यासमोर जिल्ह्यातील गुळ उत्पादकांच्या समस्या मांडल्या. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख पवार म्हणाले, भारत शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादन योजनेतंर्गत कोल्हापूर गुळाची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात यापुर्वी 1150 इतकी गुऱहाळ घरे होती. हि संख्या सध्या 400 पर्यंत आली आहे. गुऱहाळ घराच्या माध्यमातून वर्षाला 500 ते 700 कोटींची उलाढाल होते. एका गुऱहाळ घरामधून साधारणतः 22 ते 25 जणांना रोजगार मिळतो. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी गुळ व्यवसाय टिकणे महत्त्वाचे आहे.
सध्या या व्यवसायासमोर उत्पादनाचे आधुनिकीकरण, मुल्यवर्धित उत्पादने करणे, आकर्षक वेश्टण करणे, प्रभावी जाहीरात करणे, सेंद्रीय गुळाचे उत्पादन, निर्यात, गुळासाठी ब्रँड अँम्बॅसिडर नेमणे, क्लस्टर तयार करणे, शेतकरी, उत्पादक, कर्मचारी यांनी प्रशिक्षण देणे, कौशल्य वृद्धी करणे अशा अनेक समस्या गुळ व्यवसायासमोर आहेत. गुळ उत्पादकांच्या या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी विनंती पवार यांनी यावेळी केली.