प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज, सोमवारी देखील कायम राहिला. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून 94 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पाणीपातळी 36.7 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचगंगा खोऱ्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चंदगड आणि गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
चंदगड तालुक्यात 130.83 मिमी पाऊस
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सर्वाधिक 130.83 मिमी पावसाची नोंद झाली.तर हातकणंगले तालुक्यात 25.25 , शिरोळ- 20.71 , पन्हाळा- 69.43 , शाहूवाडी- 73 , राधानगरी- 89 , गगनबावडा-124.50 , करवीर- 67.55 , कागल- 61.71, गडहिंग्लज- 60.43 , भुदरगड-94.40 , आजरा- 116.25 , तर चंदगडमध्ये 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राधानगरीतून 7112; अलमट्टीतून 250000 क्युसेक विसर्ग
राधानगरी धरणात 236.79 दलघमी पाणीसाठा आहे. सोमवारी सकाळी 7 च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणाचे 3,4,5 व 6 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरीतून 7112, कोयनेतून 55958 तर अलमट्टी धरणातून 250000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
94 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- तारळे, शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे, तुळशी नदीवरील बीड, आरे, बाचणी व घुंगुरवाडी, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पणोरे, गवशी, मासुर्ली, कासारी नदीवरील- यवलूज, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ-तिरपण, ठाणे आवळे, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कळे, शेणवडे व मांडूकली, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, शिगांव, मांगले सावर्डे, खोची व दानोळी, कडवी नदीवरील- सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिरगांव, सवर्तेसावर्डे, सरूडपाटणे, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सुळंबी, तुरंबे व वाळवे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, शेळोली, शेणगाव व करडवाडी, हिरण्यकेशी नदीवरील-साळगांव, निलजी, गिजवणे, ऐनापूर, खणदाळ, हरळी, जरळी, दाभीळ, देवर्डे, चांदेवाडी व भादवण, घटप्रभा नदीवरील-कानडे-सावर्डे, आडकूर, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगाव, तारेवाडी व कानडेवाडी, ताम्रपणी नदीवरील- कोकरे, चंदगड, कूरतनवाडी, कोवाड, हल्लारवाडी, माणगाव, उमगाव व न्हावेली असे एकूण 94 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 92.39 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 109.76 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
– जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा
तुळशी 92.99 दलघमी, वारणा 892.03 दलघमी, दूधगंगा 669.28 दलघमी, कासारी 66.96 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 68.31 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 35.72 दलघमी, चित्री 53.414 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा 44.170 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.
पंचगंगेची पाणी पातळी 36.7 फूटांवर असून सुर्वे बंधारा 34.10 फूट, रुई 64.8 फूट, इचलकरंजी 60.6 फूट, तेरवाड 55 फूट, शिरोळ 52.6 फूट, नृसिंहवाडी 50 फूट, राजापूर 41 फूट तर नजीकच्या सांगली 32.6 फूट व अंकली 35.7 फूट अशी आहे.