सांगरुळ / वार्ताहर
कोविड अनलॉक व दीपावली सुट्टीमुळे रक्तदाते पर्यटनात व्यस्त आसल्याने तसेच ग्रामीण भागात शेतीच्या हंगामाला सुरवात झाल्याने रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली आहे. यामुळे रक्तपेढीतून रक्ताची आवक कमी झाली आहे. रक्ताच्या नियमीत सरासरी मागणी मध्ये बदल न झाल्याने रक्तपेढीतील रक्तसाठा कमी झाला आहे. जिल्ह्यातील रक्तटंचाई दूर करण्यासाठी सेवाभावी संस्था व युवकांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशराव घुंगुरकर यांनी केले आहे.
पुर्वनियोजीत शस्त्रक्रिया, बाळंतपण, विविध आपघात अशा प्रसंगात रक्ताची गरज भासते याचबरोबर, कँन्सररूग्ण, थॕलेसमिया, डायलेसीस अशा रुग्णांना उपचारावेळी सातत्याने रक्ताची गरज भासते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज किमान दोनशे रक्तपिशव्यांची मागणी असते. तसेच डेंग्यूचेही रुग्ण काही प्रमाणात असून त्यांनाही प्लेटलेटची मागणी होत आहे. जिल्ह्यातील रक्तपेढ्यामध्ये केवळ ७०० ते ८०० रक्तपिशव्या म्हणजे दोन तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. तसेच काही ठराविक गृपचेच रक्त शिल्लक असलेने इतर गृपच्या रक्ताची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तदाते मिळविण्यासाठी धावपळ सुरु आहे. रक्त उप्लब्ध नसताना नातेवाईकांनी रक्तदान करुन आपल्या रुग्णांची रक्ताची सोय करण्यापेक्षा राजकिय तसेच सामाजिक कार्यकर्त्ते यांची ओळख काढून रक्तपेढ्यांवर दबाव टाकून रक्त मिळविण्यासाठी केविलवाना प्रयत्न सुरु आहे.यादरम्यान रक्तपेढ्या व नातेवाईक यांच्यामध्ये वाद निर्माण होत असलेचे चित्र आहे.
युवकांच्या सहभागाची गरज
रक्ताची टंचाई दुर करण्यासाठी सामाजिक संस्था ,राजकिय,सामाजिक कार्यकर्ते यानी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. तसेच रक्तदात्यांनी आपल्या वेळेनुसार जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान तसेच प्लेटलेट दान करावे.वातावरण बदलामुळे रक्तदानासाठी पोषक वातावरण आहे.रक्तदान जनजागृती साठी युवक-युवतीनी सोशल मिडीयावरुन रक्तदात्यांना आवाहन करावे – प्रकाश घुंगूरकर अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन