शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस न आणण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र शासनाच्या अद्यादेशानुसार बाजार समितीच्या आवाराबाहेरील क्षेत्रात धान्य, कडधान्य, तेलबिया आणि इतर शेतमाल नियमनमुक्त केलेला आहे. या आदेशानुसार शेतकऱयांचे आर्थिक नुसान होणार असून, हमाल, तोलाईदार यांना रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्त राज्यभर छेडलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून जिल्हय़ातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत. तरी शेतकऱयांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील व सचिव मोहन सालपे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, केंद्रशासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राज्यशासनाने परिपत्रकाव्दारे बाजार समित्यांना आदेश दिले आहेत. सध्या बाजार समितीमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री सौद्याने उघडपणे होत असल्याने शेतीमालाला चांगला दर मिळतो. शेतकऱयाच्या शेतीमालाला चांगला दर मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीचे असल्याने शेतकऱयांची फसवणूक होत नाही.
केंद्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार शेतीमालावर बाजार समितीचे नियंत्रण राहणार नसल्याने शेतीमालाचे वजन किंवा दरामध्ये शेतकऱयांची फसवणूक होणार आहे. एकंदरीतच शेतकऱयांसह शेती उत्पन्न बाजार समितीशी निगडीत सर्वच घटकांचे नुकसान करणारा अद्यादेश आहे. त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती आंदोलनात सहभागी होणार आहे.