मृत वृद्धा पाचगावची, संशयित टाकाळा येथील
प्रतिनिधी / कोल्हापूर
पाचगाव येथील शांताबाई शामराव आगळे (वय 80) हिला देवकार्यासाठी नेतो, असे सांगून संशयित संतोष निवृत्ती परीट (वय 35, रा. माळी कॉलनी, टाकाळा) याने तिचा शुक्रवारी सायंकाळी माळी कॉलनीत खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे करून ते राजाराम तलाव टाकल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. करवीर व राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयिताला अटक करत खूनाचा प्रकार उघडकीस आणला. संशयिताने 10 तोळे सोन्यासाठी वृद्धेचा खून केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे यांनी दिली.
राजारामपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत वृद्धेच्या खुनाची माहिती अपर पोलीस अधिक्षक काकडे यांनी दिली. यावेळी शहर पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक अनील गुजर आदी उपस्थित होते.
घटनास्थळवरून मिळालेल्या माहितीनुसार राजाराम तलाव परिसरात बुधवारी सकाळी फिरायला गेलेल्यांना रस्त्याकडेला पिशवीत मृतदेह दिसून आला. त्यांनी ही माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली.
राजारामपुरी पोलिसांना घटनास्थळी पिशवीत महिलेचा अर्धवट मृतदेंह मिळून आला. दरम्यान, अपर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक अनील गुजर आदीनी घटनास्थळाची पाहणी केली. अर्धवट मृतदेह सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. अन् तेथेच या मृतदेहाची ओळख पटली.
पाचगाव येथील जगताप कॉलनीत शोभा चव्हाण यांच्या घरी शांताबाई आगळे (वय 80) भाडÎाने रहात होत्या. त्या धार्मिक होत्या. संशयित संतोष निवृत्ती परीट (वय 35) हा मुळचा भुदरगड तालुक्यातील आहे. तो 2017 मध्ये इचलकरंजी शहापूर येथे रहात होता. त्यानंतर तो टाकाळा माळी कॉलनी येथील राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये भाडÎाने रहात आहें. त्याने बिंदू चौक परिसरात भाडÎाच्या घरात इस्त्रीचे दुकान सुरू केले होते. शांताबाई आगळेंना तो 5 वर्षांपासून ओळखत होता. कर्जबाजारी असल्याने त्याचा आगळेंकडील सोन्याच्या दागिन्यावर डोळा होता.
शांताबाई आगळेंना शुक्रवारी, 5 रोंजी त्याने देवकार्यासाठी गावी जायचे आहे, असे सांगून पाचगाव येथून सायंकाळी पांढऱया दुचाकीवरून नेले. त्याने त्यांना माळी कॉलनी येथील रहात असलेल्य अपार्टमेंटमध्ये आणले. तेथे त्यांचा खून केला. दरम्यान, शांताबाई आगळे बेपत्ता झाल्याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. बुधवारी वृद्धेचा अर्धवट मृतदेह मिळाला, बेपत्ता नोंदी पाहून आगळेंच्या नातेवाईकांना सीपीआरमध्ये बोलावून घेतले. यावेळी त्यांनी कपडÎांवरून मृतदेहाची ओळख पटवल्यामुळे तपासाला गती आली.
पोलिसांनी संयुक्तपणे शोंधमोहीम राबवली अन् दुपारी संशयित संतोष परीटला ताब्यात घेतले तर राजाराम तलाव परिसरात पोलीस पथकांची शोध मोहीम सुरूच राहिली. दुपारी मृतदेह सापडल्याच्या ठिकाणापासून 100 मीटरवर झुडपात वृद्धेचे शिर मिळाले तर पश्चिमेकडील छोटÎा नाल्यात वृद्धेचा कोपरापासून तुटलेला हात मिळाला. मृताच्या उर्वरीत देहाचा शोध सुरू आहे. घटनास्थळी दुचाकीच्या टायरचे ठसे मिळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयिताला अटक केली. त्याने 10 तोळे सोन्यासाठी कर्जबाजारीपणातून वृद्धेचा खुन केल्याची कबुली दिली. अवघ्या सहा तासांत पोलिसांनी हा खून उघडकीस आणला. तपासात जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी, करवीर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले, जौजाळ, विवेक राळेभात, विनायक सपाटे, समाधान घुले, अमित सर्जे, सागर कांडगावे, अमोल कोळेकर, संदीप कुंभार, राम कोळी, अजय वाडेकर, सुरेश पाटील, तानाजी गुरव आदींनी सहभाग नोंदवला.
खूनासाठी वापरलेल्या हत्याराचा शोध
शांताबाई आगळेचा संशयित परीटने अपार्टमेंटखाली खून केला, पण खुन कसा केला, हे अद्यापी त्याने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे राजाराम तलाव परिसरात मृतदेह आणला कोणी, दुचाकीवर त्याच्यासमवेत आणखी कोण होते का, मृतदेंहाचे तुकडे त्यानेच केले का, खुनासाठी त्याने कोणते हत्यार वापरले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
वृद्धेच्या अंगावरील दागिने विकल्याची कबुली
वृद्धेच्या अंगावर 10 तोळे दागिने होते, ते खुनानंतर काढून घेतले आहेत. ते विकून टाकले आहेत, अशी कबुली संशयिताने दिली आहे. यामध्ये त्याचा आणखी कोणी सहकारी आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहे.
शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार
संशयिताने वृद्धेचा खून 5 फेब्रुवारीला नेल्यानंतरच लगेचच केला, पण मृतदेह राजाराम तलाव परिसरात टाकल्यानंतर गेल्या तीन दिवसांत कुत्र्यांनी या मृतदेहाचे लचके तोडले आहेत. त्यातूनच एक हात नाल्यात मिळाला आहे. मृताच्या डोक्याची कवटी मिळाली, पण तीही सडली आहे. त्यामुळे मृतदेहाचे तुकडे केले की तो टाकल्यानंतर कुत्र्यांनी मृतदेहाचे तुकडे लचके तोडल्याने झाले का, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.