उत्पनापेक्षा खर्च जास्त : ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्याकडे
व्हनाळी / सागर लोहार
जनावारांचा गोठा उभा केल्यावर लाखो रूपयांचा फायदा मिळतो. अशी स्वप्न दाखवल्यामुळे हाजारो ग्रामिण तरूण नोकरीच्या मागे न लागता या व्यवसायात उतरले खरे काहीनी स्वतःचे पैसे यामध्ये गुंतवले तर अनेक तरुणांनी बँकांचे कर्ज घेऊन जनावरांचा गोठा उभारला परंतू प्रत्यक्षात कोरानासारख्या महामारीच्या आडचणीनंतर बॅंकांनी लावलेल्या वसुलीच्या तगाद्यामुळे नियोजन कोलमडल्याने अनेक तरूण आर्थिक अरिष्ठात सापडे आहेत.
आंदनी आठणी आणि खर्चा रूपया अशी आवस्था दुग्ध व्यवसाय धारकांची झाली आहे. या सर्वाला पशुखाद्याचे वाढलेले दर,इंधनदरवाड,लेबर पगार आणि याच्या कितीतरी कमी तुलनेत दुधाचा वाढलेला दर याचीदेखील झालर जबाबदार आहे. परंतू मध्यांतरी आलेले कोरोनाचे लॅाकडावून आणि त्यानंतर वाढलेले पशुखाद्याचे दर आणि आर्थिक बजेट वाढल्यामुळे जनावारांचे दैनदिन विस्कटलेले नियोजन यामुळे तसेच कोरोना काळात एम.पी.यु.पी.कडील कामगार पळून गेल्यामुळे या दुग्धव्यवसाय धारकांची आवस्था अतिशय बिकट झाली. तसेच या काळात बॅंकानी आपली वसूली थांबवली त्यामुळे दुग्ध व्यवसाय धारकांनी ते हप्त्याचे पैसे वाढलेल्या पशुखाद्याच्या दराकडे वळवले. त्यामुळे साहजीकच बॅंकांचे हाप्ते तटले.आणि दुग्ध व्यवसाय धारक चक्रवाढ व्याजात आडकले. या सर्व घडामोडीत दुधाचे दर मात्र त्या पटीत वाढलेले नाहीत. याचा मोठा परिणाम या दुग्ध व्यवसायावर झाला आहे.
साके ता.कागल येथील संदीप पाटील, संतोष पाटील, अमर पाटील या तिघा तरुणांनी नोकरी पेक्षा व्यवसाय बरा म्हणून नोकऱ्या सोडून या दूध धंद्यात उतरण्याचे धाडस केले. गोठ्यात एकूण 63 म्हशी व चार गाई शिवाय लहान बच्चे 19 अशी मिळून 86 जनावर या आहेत. यासाठी एकूण सुमारे 96 लाखांची गुंतवणूक असून यामध्ये 40 लाख रुपये स्वतःचे तर ते 60 लाख रुपये बँकेचे कर्ज घेतले आहे . पहिल्या एक-दोन वर्षात वैरण पशुखाद्य व मजूर पगार आवाक्यात असल्याने या व्यवसायातून त्यांना नफा मिळू लागला गेल्या वर्षभराच्या काळात व सध्या वाढलेल्या पशुखाद्याच्या दरामुळे त्यांचा दुधाचा दर व मिळणाऱ्या पशुखाद्याच्या दर यांच्यातील तफावत पाहता हा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात चालू आहे.
दुग्धव्यवसायाचे वार्षिक दुधाचे उत्पन्न 50 लाख 34 हजार चारशे रुपये आहे. यातून पशुखाद्य वैरण चारा व मजूर पगार,कर्जाच्या हप्त्याची रक्कम 69 लाख 88 हजार 800 रूपये वजा केली असता एकूण वार्षिक उत्पन्नापैकी 19 लाख 54 हजार चारशे रुपयाने त्यांचा व्यवसाय आज तोट्यात चालवत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला केलेली लाखो रुपयांची गुंतवणूक व बँकेचे घेतलेले कर्ज त्याचे होणारे दिवसेंदिवस व्याज याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने हा दुग्ध व्यवसाय तरुणांना अडचणीचा ठरत आहे. साके गावात 15 जनावरांचे गोठे असून काहींनी परवडत नाहीत म्हणून सुमारे चार गोठे बंद केले आहेत. अनेक तरुण लाखो रुपयांचे कर्जबाजारी झाले आहेत यातून आता त्यांना सावरण्याची गरज आहे मात्र दराचा ताळमेळ नसल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जादा अशी अवस्था या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या गोट्यांच्या एकूणच या वास्तवातून दिसत आहे.
धरलं तर चावतयं दुग्ध व्यवसाय धारकांच्या गुंतवणीकीचा विचार केल्यास आता हा व्यवसाय आर्थिक अरिष्ठात आहे म्हणून बंद करणे सुद्धा आवघड आहे कारण हा व्यवसाय बंद केल्या लाखो रूपयांचा तोटा आटळ आहे. आणि सुरू ठेवल्यावर देखील महिन्याला 2 लाख 19 हजार एवढा तोटा होत आहे. त्यामुळे धरलं तर चावतयं आणि सोडलं तर पळतयं अशी आवस्था या दुग्ध व्यवसाय धारकांची झाली आहे. कांही मोजकेच कर्जमुक्त दुग्ध व्यवसाय धारकच या व्यवसायात टिकून आहेत. |
दूध दरवाढ करा; पशुखाद्य दर नियंत्रीत करा पशुखाद्य, लेबर जॅर्जेस वाढल्यामुळे शिवाय दुधाचा दर पशुखाद्याच्या किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय तोट्यात जात. शासनाने दुध दरवाढ करून पशुखाद्याचे दर नियंत्रीत केल्यास हा व्यवसाय पुर्वीप्रमाणे नफ्यात येईल अन्यथा हा व्यवसाय बंद पडण्याची शक्यता वाटत आहे. संदिप पाटील, साके, दुग्ध व्यवसाय धारक |