प्रतिनिधी / मिरज
कोरोनामुळे प्रवासी संख्या घटल्याने रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या आता पूर्ववत करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या सुरू केल्या असून दोन जुलैपासून कोल्हापूर-नागपूर मार्गावर विशेष एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
आठवड्यातून शुक्रवार आणि सोमवार अशी दोनवेळा धावणारी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस गाडी (01404) कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस 2 जुलैपासून तर नागपूरहुन कोल्हापूरकडे येणारी नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस (01403) 3 जुलैपासून धावेल. केवळ आरक्षित प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असेल.