शनिवारी रात्रीच्या पाकच्या भ्याड हल्यात संग्राम पाटील हुतात्मा…
चुये / प्रतिनिधी
जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात निगवे खा.ता.करवीर येथील जवान संग्राम पाटील हा शहीद झाला आहे. शनिवारी रात्री राजौरी सीमेवर ही चकमक झाली. गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणात हुतात्मा झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
सैन्य दलात 16 मराठा बटालियनमध्ये तो सेबेत होता. शूर जवान संग्राम सीमेवर शहीद झाल्याने पाटील कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वीर जवान ऋशिकेश जोंधळे शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुर जिल्ह्यात सलग दुसरा जवान शहीद झाला आहे. शहीद जवान संग्राम पाटील याला हवालदार म्हणून बढती मिळाली होती. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिनी असा परिवार आहे.