प्रतिनिधी / कोल्हापूर
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची पुणे येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) या पदावर बदली झाली. त्यांच्या जागेवर रायगड `एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी शंकरराव जाधव हे नवे निवासी उपजिल्हाधिकारी सामवारी रुजू झाले.
शंकरराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडून सुत्रे स्विकारली.
जाधव यांचे मूळगाव मेडशिंगे ता. सांगोला, जि. सोलापूर असून त्यांनी दापोली येथील कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. ऍग्रीचे शिक्षण घेतले आहे. हवेली (जि.पुणे) येथे तहसिलदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 2004 मध्ये कोल्हापूरचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काम पाहीले आहे. एक वर्षभराच्या काळात त्यांनी दत्त आसुर्ले-पोर्ले, हमीदवाडा-कागल अशा महत्वाच्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांसह लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.