नागरिक त्रस्त, ग्रामपंचायतीच्या कारभार्यांनी पाठपुरावा करावा
वार्ताहर/पुलाची शिरोली
महावितरणच्या अधिकारी नसल्या कारणाने पुलाची शिरोलीचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येथील तांञीक काम करीत असलेल्या लाईनमेनवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे नागरीक व व्यावसायिक हैराण झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून गांधीनगरचे सुतार यांचेकडे शिरोलीचा प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज आहे. ते तेथूनच शिरोलीचा गावगाडा चालवत आहेत. तरी कायमस्वरूपी अधिकारी मिळावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. याबाबत शिरोली ग्रामपंचायतीच्या कारभार्यांनी पाठपुरावा करावा अशी देखील ग्रामस्थांची मागणी आहे.
गावात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी असे सुमारे दहा हजार ग्राहक आणि एक कोटीहून अधिक वसुली असणार्या पुलाची शिरोली गावासाठी दिवसभरासाठी केवळ दोनच सेवा कर्मचारी देऊन महावितरणने गावाची थट्टाच केली आहे. हे कर्मचार्यामध्ये ग्राहकांच्या तक्रारीचे निरोपाची देवाण घेवाण होत नाही. त्यामुळे ग्राहकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार निवारण करण्यासाठी महावितरणने दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक अनेक वेळा उचललाच जात नाही. उचललाच तर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.
एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येला दिवसा काम करणारे केवळ दोनच सेवा कर्मचारी व रात्र पाळीत वरवरचे काम करणारे मग दिवसभर काम करून तक्रारी संपुष्टात कशा संपुष्टात येणार हा प्रश्र्न आहे. अशा परिस्थितीत पुलाची शिरोली गावासाठी कनिष्ठ अभियंता दर्जाचा कायमस्वरूपी अधिकारी व आणखी दोन सेवा कर्मचारी वाढवून मिळावेत अशी मागणी होत आहे.