प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामीण भागातील महिला बचतगटना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम होत आहे तर खाद्यपदार्थ बरोबर घर उपयोगी साहित्य बनवण्यासाठी पाठबळची गरज असल्याचे अध्यक्षा सुवर्णा दुबुले यांनी सांगितले.
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले गावातील तुळजाभवानी बचत गटाचा वर्धापन दिनानिमित्त गावातील महिलांना एकत्र येत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षा सुवर्णा दुबुले म्हणाल्या, ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय, खाद्यपदार्थ बनवून विक्री केली जाते याचंबरोबर घरगुती वस्तू बनवण्याचा वरती बचत गटाच्या माध्यमातून काम केले जाईल यासाठी बचतगटांची कामाची दखल घेऊन आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे यामुळे ग्रामीण भागातील महिला आणखी सक्षम होतील. गटाच्या सुरवातीपासून महिलांना राज्य शासनाने तसेच जिल्हा बँकेकडून महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असल्याचं सांगितले.
वर्षभरात गटांच्या मध्यातून चागले कामे केल्याबद्दल आदित्य कंदुरकर याच्या हस्ते प्रमाणपत्र गिफ्ट देण्यात आली आहेत यावेळी कविता माने, शिल्पा शिंदे, स्वाती पाटील, सरिता विलास दुबुले. व तसेच गटाच्या सर्व महिला सदस्या उपस्थिती होती.