भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
आरक्षणासहा राज्याच्या हितासाठी विरोधी पक्षाचे सरकारला सहकार्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा समाजाला मान्य होईल असा तोडगा सरकारने काढावा, मराठा आरक्षणासह राज्याच्या हिताच्या निर्णयासाठी विरोधी पक्ष सरकारला सहकार्य करतील त्याच बरोबर मराठा आरक्षणा संदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्यानेच स्थगिती मिळाली, असा आरोप करीत चंद्रकांत पाटील म्हणाले, मागील सरकारने नियमात बसवून टिकणारे आरक्षण मराठा सामजाला दिले होते. उच्च न्यायालयात त्यावर शिक्कामोर्तबही झाले. मात्र सर्वोच्च न्यायालयात निर्णय विरोधात गेला. मात्र आता आरक्षणासाठी सर्व पक्षिय ताकद लावण्याची गरज आहे. शरद पवार यांनी अध्यादेशाचा मार्ग सूचवला आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, अध्यदेश हा पर्याय होवू शकत नाही. विधान सभा, विधान परिषदेत एकमताने मंजूर केलेले आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली अध्यादेशाला तर एका तासात स्थगिती मिळू शकते. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.
कादा निर्यात बंदी मागे घेण्याची केंदाला विनंती
कोरोनाच्या काळात कांद्याला जादा भाव मिळाल्याने चार महिन्यात अधिक निर्याय झाली. त्यामुळे निर्यातबंदी करण्यात आली. भविष्यात कांद्याची टंचाई भासू नये यासाठी निर्यातबंदी केली आहे. यात शेतकऱयांचे नुकसान करण्याचा सरकारचा हेतू नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व मी निर्यात बंदी मागे घेण्यात यावी. असे पत्र मंत्री पीयुष गोयल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. असेही त्यांनी सांगितले. मागील चार महिन्यात किती निर्यात झाली. गत वर्षी याच महिन्यात किती निर्यात झाली आहे. याची माहिती घेत असल्याचे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले असून रेशनवर सवलतीच्या दरात कांदा उपलबद्ध करुन द्याव व केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱयांना अनुदान द्यावे अशी मागणीही केल्याचे पाटील यांनी सांगितले.
नाथाभाऊ नाराज नाहीत
एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते सातत्याने त्यांच्या संपर्कात असतात ते नाराज नाहीत. मीही त्यांच्याशी वारंवार बोलत असतो. असे चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. बिहारला जाण्यापूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्वच्छ शब्दात भूमिका मांडली आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार केला त्यांचीच चौकशी समिती
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचीच चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचा उघडकीस येणार कसा असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, हाफकिनने 40 रुपयाला एन95 मास्क किंमत निर्धारीत केली होती. असे असताना तो 200 रुपयांना खरेदी केला, पीपीई किटमध्याही अशाच पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे. हा गैरव्यवहार स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नव्याने चौकशी करण्याची गरज नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कालमर्यादा देवून त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली.