प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर ते अनुस्कुरा या मार्गावर असलेल्या मलकापूर ते उचत या दोन किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडी बरोबरच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांची कसरत तर प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष अपघातास कारणीभूत. ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांची करावी लागतेय कसरत. याकडे लक्ष देणार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून मोठे लागली आहे.
लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. मात्र, रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि त्यातून करावा लागत असलेला खडतर प्रवास यामुळे नागरिकांसह वाहनधारकांची ही चांगलीच कसरत होत आहे. मलकापूर ते अनुष्कुरा या मार्गावर वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र, मलकापूर ते उचत या दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्याची चाळण झाली असून अपघात सदृश्य घटना घडत आहेत मंगळवार पेठ पासून काही अंतरावर महत्त्वाच्या ठिकाणी व रस्त्याच्या मध्यभागी पाण्याचा उमाळा सुटला असून त्या ठिकाणी अपघात सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
संबंधित विभागाचे दुर्लक्ष
दरम्यान याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी पडलेली चर तात्पुरती मलमपट्टी करून संबंधित विभागाने आपली जबाबदारी पार पाडली होती. मात्र, दिवसागणिक रस्त्यावरील खड्डा वाढत आहे याकडे पुन्हा एकदा संबंधित विभागाने केलेल्या दूर्लक्ष अपघाताला कारण ठरू लागला आहे. तातडीने हा पडलेला खड्डा भरून घ्यावा अशी मागणी नागरिकांतून त्याचबरोबर वाहनधारकांच्यातून होऊ लागली आहे. अपघात घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार का असा खोचक सवालही वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. या मार्गावरून होत असलेली ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांची कमालीची कसरत जीवघेणी ठरत आहे.