रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेचे साखर सहसंचालकांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर:
कोल्हापूर, सांगली जिल्हÎातील साखर उतारा गुजरातच्या गणदेवी कारखान्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे येथील कारखान्यांकडे गणदवीपेक्षा जादा दर देण्याची कुवत आहे. या कारखान्याचा 12.50 उताऱयाला चार हजार रुपये दर आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी गणदेवी प्रमाणे अंतिम दर द्यावा त्यापूर्वी पहिली उचल एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत अशी मागणी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रादेशीक साखर सहसंचालक सदाशिवराव जाधव यांना दिले आहे.
जिल्हÎातील कारखान्यांची परिस्थिती चांगली असूनही जानिवपूर्वक दर दिला जात नाही. शेतकऱयांना लुटले जात आहे. शेतकऱयांना दर द्यायचा म्हटले की उसाचे बंपर उत्पादन, अतिरिक्त साखरचे अवाई उठवली जाते. या सर्व अडचणीवर मात करुन अन्य राज्यातील कारखाने दर देतात ते कोल्हापूर विभागातील कारखान्यांना का शक्य नाही. अशी विचारणा निवेदनातून केली आहे. पहिली उचल एफआरपी अधिक दोनशेवर आम्ही ठाम आहोत. याबाबत कारखानादारांना आदेश काढावेत, इथेनॉल उत्पादनाचा विचार केला तर टनाला चार हजार देणे शक्य आहे. तरी जिल्हाधिकाऱयांसमवेत तातडीने बैठक बोलावण्यात यावी असे ही निवेदनात म्हटले आहे. ऍड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात टी. आर. पाटील, राजहू खुर्दाळे, बाबासाहेब मिरजे, गोरख चंदणशिवे, धनाजी चौगले, बाबासाहेब गोसावी आदींचा समावेश होता.