प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरालगतच्या गावांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे ग्रामदक्षता समित्यांनी दक्ष राहून काम करावे, असे आवाहन पुणे विभागीय उपायुक्त पी.बी.पाटील यांनी केले.
गांधीनगर, मुडशिंगी, वळीवडे, आदी कोल्हापूर शहरालगतच्या गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देवून घेतला कोरोना संसर्गाबाबत आढावा घेतला. यावेळी आयोजित बैठकीत sते बोलत होते. बेठकीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) भालेराव, गटविकास अधिकारी सचिन घाटगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ जी.डी. नलवडे आदी उपस्थित होते.
कोवीड-19 विषाणू साथ प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत सूचना देताना उपायुक्त पाटील म्हणाले, नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर अनिवार्य करावा, वारंवार हात साबणाने धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. पुढील धोका लक्षात घेवून जादा बेड, आवश्यक मनुष्यबळ नियोजन आरोग्य विभागाने करावे असे निर्देश दिले. तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. कोवीड-19विषाणू साथीचे चित्र असेच राहिल्यास धोका अधिक निर्माण होवू शकतो, म्हणून ग्राम समितीने अत्यंत दक्षतापूर्वक काम करणे, गांवामध्ये बाहेरुन येणाऱया नागरिकांची नोंद ठेवावी असे सूचना दिल्या. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगाचा प्रार्दुभाव होवू नये, या बाबत योग्य ती उपाय योजन सर्व ग्रामपंचायतीने घ्यावी. 3 महिने पुरेशी 33 टक्के क्लोरीनयुक्त ब्लिचिंग पावडर उपलब्ध ठेवावी. नियमित पाणी शुध्दीकरण होईल यांची दक्षता घ्यावी असेही यावेळी स्पष्ट केले.