कोल्हापूर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे येथे आयोजित किल्ला स्पर्धेत अनिकेत युवराज पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. मरळी येथील सामाजिक संस्थेचे पदाधिकाऱयांच्या प्रमुख उपस्थितीत व वाघुर्डे गावच्या सरपंच अनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून नाईक यांचा हा उपक्रम सुरु आहे.
स्पर्धेमध्ये एकूण 75 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अनिकेत युवराज पाटील, पार्थ शंकर गुरव, पार्थ बाबासो चौगले, राजवर्धन संदीप पाटील, श्रेयस शरद नाईक यांनी अनुक्रमे यश मिळवले. यशस्वी स्पर्धकांना गौरवपत्र व रोख रक्कम देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल इतर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सुरेश नाईक यांनी स्वागत केले. शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समर्थ संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र बच्चे, उपाध्यक्ष बाजीराव वर्पे, शरद दंताळ, आनंदा पाटील, बबन पानारी, रंगराव शिखरे आदी उपस्थिती होते. संभाजी दांगट यांनी आभार मानले.